विशेष प्रतिनिधी
मुंबई : operation sindoor च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये चर्चा केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोनदा पत्र लिहून केली. पण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वेगळ्या पद्धतीने त्या मागणीत खोडा घातला. संरक्षणाच्या गंभीर मुद्द्यावर गंभीर चर्चा होणे अपेक्षित आहे. ती संसदेच्या विशेष अधिवेशनात करण्यापेक्षा सर्वपक्षीय बैठकीत चांगली होऊ शकते, असे पवार म्हणाले.
राहुल गांधींसकट काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी लावून धरली. त्यामध्ये सचिन पायलट, कपिल सिब्बल, भूपेश बघेल यांचा समावेश राहिला. अखिलेश यादव यांनी देखील ही मागणी उचलून धरली.
पण या संदर्भात शरद पवारांनी मात्र वेगळे मत व्यक्त केले. संरक्षण हा अतिशय गंभीर आणि देशाच्या दृष्टीने संवेदनशील विषय आहे. राष्ट्रहिताच्या दृष्टीने काही माहिती गोपनीय ठेवणे आवश्यक असते. सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवायचे ठरवले, तर त्याला आमचा विरोध नाही, पण संरक्षणासारख्या गंभीर विषयात संसदेच्या विशेष अधिवेशनात तेवढीच गंभीर चर्चा होईल, की पंतप्रधान संरक्षण मंत्री यांनी देशातल्या सर्व पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना एकत्र बोलवून गंभीर चर्चा होईल, याचा विचार केला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसने केलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या मागणीला छेद गेला.
Sharad Pawar rejects Congress’ demand for a special session of Parliament!!
महत्वाच्या बातम्या
- इंदिरा गांधींची आठवण काढून काँग्रेसने मोदींना टोचले; पण शशी थरूर + चिदंबरम यांनी मोदींच्या निर्णयाला वाखाणले!!
- दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!
- Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!
- Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार