• Download App
    Sharad Pawar जरांगेंच्या माघारीच्या निर्णयाची पवार खुशी; महाविकास आघाडीच्या मतांची झाली बेगमी!!

    Sharad Pawar जरांगेंच्या माघारीच्या निर्णयाची पवार खुशी; महाविकास आघाडीच्या मतांची झाली बेगमी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मनोज जरांगे यांच्या निवडणूक लढण्यापासून माघार घेण्याच्या निर्णयाने शरद पवार खुश झाले. त्यांनी योग्य निर्णय घेतला. त्यामुळे बरे झाले, असे पवार म्हणाले.

    मनोज जरांगे यांनी मोक्याच्या क्षणी निवडणूक लढण्यापासून माघार घेतली. त्याऐवजी तुम्हाला पाडायचे ते उमेदवार पाडा, असे सांगून भाजपच आपला शत्रू असल्याचे निर्देशित केले. जरांगे यांच्या या वक्तव्यावर शरद पवार खुश झाले आणि त्यांनी आनंद व्यक्त केला.

    मनोज जरांगे यांनी उमेदवार दिले असते, तर मत विभागणीचा भाजपलाच फायदा झाला असता. आता ते उमेदवार देत नसल्यामुळे मत विभागणी होणार नाही आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होईल. कारण त्यांनीच जाहीर केल्याप्रमाणे भाजप त्यांचा शत्रू आहे, असे पवार म्हणाले.

    मनोज जरांगे यांचे आंदोलन आणि त्यांचा माघारीचा निर्णय या पार्श्वभूमीवर पवारांच्या तोंडून प्रथमच जरांगे आणि महाविकास आघाडी यांच्यातले राजकीय साटे लोटे बाहेर आले.

    Pawar happy with Jarange’s decision to withdraw

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नसरापूर अत्याचार प्रकरणात रोहित पवारांनी घुसवले राजकारण; महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून अजित दादांच्या राष्ट्रवादीत मारली पाचर!!

    नसरापूर अत्याचार प्रकरणाला काही लोकांकडून वेगळे वळण; देवेंद्र फडणवीसांनी ठेवले वर्मावर बोट!!

    Election Commission : बंगालच्या फालता मतदारसंघातील मतदान निवडणूक आयोगाने रद्द केले; 21 मे रोजी फेरमतदान, 24 मे रोजी निकाल