• Download App
    Sharad Pawar जरांगेंच्या माघारीच्या निर्णयाची पवार खुशी; महाविकास आघाडीच्या मतांची झाली बेगमी!!

    Sharad Pawar जरांगेंच्या माघारीच्या निर्णयाची पवार खुशी; महाविकास आघाडीच्या मतांची झाली बेगमी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मनोज जरांगे यांच्या निवडणूक लढण्यापासून माघार घेण्याच्या निर्णयाने शरद पवार खुश झाले. त्यांनी योग्य निर्णय घेतला. त्यामुळे बरे झाले, असे पवार म्हणाले.

    मनोज जरांगे यांनी मोक्याच्या क्षणी निवडणूक लढण्यापासून माघार घेतली. त्याऐवजी तुम्हाला पाडायचे ते उमेदवार पाडा, असे सांगून भाजपच आपला शत्रू असल्याचे निर्देशित केले. जरांगे यांच्या या वक्तव्यावर शरद पवार खुश झाले आणि त्यांनी आनंद व्यक्त केला.

    मनोज जरांगे यांनी उमेदवार दिले असते, तर मत विभागणीचा भाजपलाच फायदा झाला असता. आता ते उमेदवार देत नसल्यामुळे मत विभागणी होणार नाही आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होईल. कारण त्यांनीच जाहीर केल्याप्रमाणे भाजप त्यांचा शत्रू आहे, असे पवार म्हणाले.

    मनोज जरांगे यांचे आंदोलन आणि त्यांचा माघारीचा निर्णय या पार्श्वभूमीवर पवारांच्या तोंडून प्रथमच जरांगे आणि महाविकास आघाडी यांच्यातले राजकीय साटे लोटे बाहेर आले.

    Pawar happy with Jarange’s decision to withdraw

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती

    ठाकरेंना वगळून मुंबईत भाजपचा मराठीचा ठसा, अजितदादा गेल्यानंतर भाजपच्या हातात राष्ट्रवादीच्या नाड्या!!