विशेष प्रतिनिधी
मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान झाले 7 मे रोजी, बीडमध्ये मतदान झाले 13 मे रोजी, पण शरद पवारांनी या दोन्ही मतदारसंघांमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आज 20 मे रोजी!! पण मूळात पवारांनी बालेकिल्ला बारामती लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप केला हेच विशेष!!Sharad pawar claims booth capture and bogus voting in baramati, beed and pune district
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी बारामती आणि बीड लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. या संदर्भात संबंधित पक्षांविरुद्ध कारवाई करावी. बारामती मतदारसंघात कधी पैसे वाटले असे मी ऐकले किंवा पाहिले नव्हते, पण यावेळी मात्र पैसे वाटले गेले. रात्री 2.00 वाजेपर्यंत बँका उघड्या होत्या. हे आत्तापर्यंत बारामती कधीच झाले नव्हते. त्या ऊपर बारामती बोगस मतदान केले गेले, अशी आमची माहिती आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी शरद पवारांनी केली.
महाराष्ट्रात बारामती, बीड आणि पुणे जिल्हा वगळता इतरत्र शांततेत मतदान झाले, पण बीडमध्ये बूथ कॅप्चरिंग झाले. पुणे जिल्ह्यातही बूथ कॅप्चरिंगचे प्रकार घडले. या सगळ्या गैरप्रकारांमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शरद पवारांनी केली.
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात 48 पैकी दहा जागांवर निवडणूक लढवत आहे त्यामध्ये बारामती, बीड आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर या जागांचा समावेश आहे. पवारांनी या तीन जागांवर बोगस मतदान झाल्याचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. एरवी पवारांनी आपल्या बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघांमध्ये बोगस मतदान झाल्याचे किंवा बूथ कॅप्चर झाल्याचे आरोप कधीच केले नव्हते. 2024 च्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी ते आरोप केले. या आरोपांचा नेमका अर्थ काय काढायचा??, शिवाय ज्या मतदारसंघांबद्दल पवारांनी आरोप केले, त्या बालेकिल्ल्यांमध्ये पवारांच्या पक्षाचे काय होणार??, असे सवाल या निमित्ताने केले जात आहेत.
Sharad pawar claims booth capture and bogus voting in baramati, beed and pune district
महत्वाच्या बातम्या
- मुंबईतील 37 मशिदींमधून व्होट जिहादचे फतवे; शिवसेनेची निवडणूक आयोग + पोलिसांमध्ये तक्रार!!
- कन्या प्रेमापोटीच पवारांनी राष्ट्रवादीतल्या ज्येष्ठ नेत्यांना मुख्यमंत्री केले नाही; अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा आरोप!!
- लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ‘या’ दिग्गजांचे भवितव्य पणाला लागणार!
- मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं मोठं विधान