विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडी संकटात सापडली आहे. उद्धव ठाकरे गटाने बुधवारी 17 उमेदवारांची घोषणा केली. त्यापैकी 3 जागांवर काँग्रेसचे दावेदार तिकीटाच्या प्रतीक्षेत होते.Sharad Pawar angry with Congress and Uddhav Thackeray; Union did not follow religion
या घोषणेने शरद पवार नाराज आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी म्हटले आहे की आमचे मित्र पक्ष युती धर्माचे पालन करत नाहीत.
इकडे तिकीट जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपमही नाराज असून, ते उत्तर-पश्चिम मुंबईतून लोकसभा लढवण्याच्या तयारीत होते. खुद्द राहुल गांधी यांनी त्यांना तिकिटाचे आश्वासन दिले होते.
खिचडी घोटाळ्यात ईडीने समन्स बजावलेल्या अमोल कीर्तिकर यांना उद्धव गटाने तिकीट दिले. मुंबई दक्षिण-मध्य आणि सांगलीच्या जागांवरही काँग्रेस नेत्यांना तिकीट मिळेल, अशी आशा होती.
वंचित बहुजन आघाडी (VBA) नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील MVA व्यतिरिक्त लोकसभा निवडणूक एकट्याने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी बुधवारी 8 उमेदवारांची नावे जाहीर केली.
याशिवाय माजी खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मविआसोबत युती करण्यास नकार दिला आहे. हातकणंगलेची जागा शेट्टींना देण्याचा प्रस्ताव मविआने ठेवला होता.
ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम संतप्त झाले आहेत. निरुपम हे उत्तर-पश्चिम मुंबईतून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. राहुल गांधी यांनीही त्यांना या जागेवरून निवडणूक लढवण्याचे आश्वासन दिले होते. आता या जागेवर ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांना तिकीट देण्यात आले आहे.
Sharad Pawar angry with Congress and Uddhav Thackeray; Union did not follow religion
महत्वाच्या बातम्या
- निर्मला सीतारामन म्हणाल्या- माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत; आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूतून लढण्याचा पर्याय होता, पण मी नकार दिला
- काका – पुतण्याचे पक्ष वेगळे होऊनही “राष्ट्रवादी काँग्रेस” नावाच्या ब्रँडचे आकुंचनच!!
- Loksabha Election : भाजपची सातवी यादी जाहीर; अमरावतीमधून नवनीत राणा यांना दिली उमेदवारी
- ‘तुरुंगातून दिल्ली सरकार चालणार नाही’ ; उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांचा केजरीवालांना धक्का!