• Download App
    Shinde शक्तिपीठ मार्ग शेतकऱ्यांवर लादणार‎ नाही, च

    Shinde :शक्तिपीठ मार्ग शेतकऱ्यांवर लादणार‎ नाही, चर्चेतून समस्या सोडवणार, नांदेडमध्ये DCM शिंदेंचे वक्तव्य

    Shinde

    विशेष प्रतिनिधी

    नांदेड : Shinde शक्तिपीठ महामार्ग कुठल्याही परिस्थितीत लोकांवर‎जबरदस्तीने लादला जाणार नाही. काही ठिकाणी विरोध‎असेल तर शेतकरी व स्थानिकांसोबत चर्चा होईल.‎विरोध कायम राहिला, तर त्या भागातील अलायमेंट‎बदलले जाईल. मराठवाड्यातील जिल्ह्यांना‎विकासाकडे नेणारा हा महामार्ग आहे. समृद्धी‎महामार्गाच्या वेळीही असाच विरोध झाला होता. मात्र,‎त्याचे महत्त्व समजल्यावर लोकांनी स्वतःहून जमीन‎दिली, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.‎ Shinde

    गुरुवारी (दि. ६) नवा मोंढा मैदानावर झालेल्या‎आभार सभेत ते बोलत होते. दुपारी २.३० वाजता‎उपमुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. विधानसभा‎निवडणुकीत बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवला‎असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी‎मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. अडीच‎वर्षे विरोधकांनी शिव्या दिल्या तरी आम्ही आमच्या‎कामांतून त्यांना उत्तर दिले. त्यामुळे जनता आमच्या‎सोबत आहे. शिव्या दिल्या तरी लोकांच्या तोंडून‎ओव्याच बाहेर पडल्या, असेही त्यांनी सांगितले.‎सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार देणाऱ्या कोणत्याही‎योजना बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.‎व्यासपीठावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,‎आमदार हेमंत पाटील, बालाजीराव कल्याणकर,‎आनंदराव बोंढारकर, माजी खासदार सुभाषराव‎वानखेडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.‎



    मराठवाड्याची दुष्काळवाडा ही‎ओळख पुसायची आहे. महायुती‎सरकारने मराठवाडा वॉटरग्रीड‎योजनेला चालना दिली. जलयुक्त‎शिवार योजना पुन्हा सुरू केली.‎महाविकास आघाडीने बंद केलेले‎प्रकल्प आणि कामे पुन्हा सुरू केले,‎लोकाभिमुख योजना राबवल्या.‎त्यामुळे मुख्यमंत्री किंवा‎उपमुख्यमंत्री पदापेक्षा लाडक्या‎बहिणींचा लाडका भाऊ म्हणून‎मिळालेला बहुमान मोठा आहे, असे‎त्यांनी सांगितले. एमआयडीसीचा‎प्रश्न सोडवणार, पाणी आणि‎रस्त्यांसह रखडलेले अन्य प्रश्न‎मार्गी लावणार, असेही एकनाथ शिंदे‎यांनी स्पष्ट केले.‎

    अजित पवारांमुळे शतक हुकले

    गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी‎ठाकरे गटावर टीका केली. ते म्हणाले, शिवसेना-भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवार आमच्या गटात‎सामील झाले. ते आले नसते तर आमच्या लढवायच्या जागा वाढल्या असत्या आणि आम्ही विजयी जागांचे शतक‎पूर्ण केले असते. शिवसेना फोडण्याचे काम संजय राऊत यांनी केले, अशी टीका मंत्री पाटील यांनी भाषणात केली.‎

    Shaktipeeth path will not be imposed on farmers, problem will be solved through discussion, DCM Shinde’s statement in Nanded

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस