• Download App
    रोहित शर्मा कोहलीनंतर टी-२० क्रिकेटमध्ये ठरला मजबूत कर्णधारRohit Sharma became the strongest captain in T20 cricket after Kohli

    रोहित शर्मा कोहलीनंतर टी-२० क्रिकेटमध्ये ठरला मजबूत कर्णधार

    रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या T२०आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेत सामनावीर ठरणारा पहिला भारतीय कर्णधार बनण्याचा मान मिळवला.Rohit Sharma became the strongest captain in T20 cricket after Kohli


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : T२०क्रिकेट संघाचा नवा कर्णधार रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली प्रथमच भारतीय भूमीवर T२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेत न्यूझीलंडचा पराभव केला. या संपूर्ण मालिकेदरम्यान स्वत: रोहित शर्मा आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडू चॅम्पियन्सप्रमाणे कामगिरी करताना दिसले.

    रोहित शर्मा सध्या तो विराट कोहलीनंतर टी-२० क्रिकेटमध्ये मजबूत कर्णधार बनला आहे. रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या T२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेत सामनावीर ठरणारा पहिला भारतीय कर्णधार बनण्याचा मान मिळवला. रोहित शर्मा या T२० क्रिकेट मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.त्याने या तीन सामन्यांमध्ये ५९ च्या सरासरीने आणि १५४.३७ च्या सरासरीने १५९ धावा केल्या.


    T20 मध्ये रोहित शर्माच टीम इंडियाचा कॅप्टन; न्यूझीलंड विरुद्धचा संघ घोषित


    रोहित शर्माने जयपूरमधील या क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात ४८ धावा केल्या होत्या,दुसऱ्या सामन्यात त्याने रांचीमध्ये ५५ धावा केल्या होत्या, तर तिसऱ्या सामन्यात कोलकाताने पुन्हा एकदा अर्धशतकाच्या जोरावर ५६ धावा केल्या होत्या.रोहितच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर भारताने मालिका जिंकली आणि त्याला मालिकावीराचा किताब देण्यात आला.

    दरम्यान जागतिक स्तरावर न्यूझीलंड विरुद्धच्या T२० आंतरराष्ट्रीय मालिकेत प्लेअर ऑफ द सिरीजचा किताब जिंकणारा शाहिद आफ्रिदी पहिला कर्णधार होता. आफ्रिदीनंतर आता रोहित शर्माने ही अप्रतिम कामगिरी केली आहे.

    Rohit Sharma became the strongest captain in T20 cricket after Kohli

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!