• Download App
    राजस्थान – उत्तर प्रदेशात जाऊन आंदोलन का करीत नाही?, या प्रश्नावर नबाब मलिक चिडले, माईक काढून चर्चेतून निघून गेले। Rajasthan - Why don't you go to Uttar Pradesh and protest ?, Nawab Malik got angry and removed the mic

    राजस्थान – उत्तर प्रदेशात जाऊन आंदोलन का करीत नाही?, या प्रश्नावर नबाब मलिक चिडले, माईक काढून चर्चेतून निघून गेले

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवरील टाइम्स नाऊ या वाहिनीच्या चर्चेत अँकर सुशांत सिन्हाने राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नबाब मलिक यांना जेव्हा राजस्थानसंबंधी प्रश्न विचारला त्यावेळी नबाब मलिक चिडले आणि कॉलर माईक काढून टाकून चर्चेतून निघून गेले. काल रात्री ही चर्चा झाली होती. Rajasthan – Why don’t you go to Uttar Pradesh and protest ?, Nawab Malik got angry and removed the mic

    महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद बाबत नबाब मलिक यांनी सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात हे आंदोलन होते. लखीमपूरमध्ये ज्या पध्दतीने शेतकऱ्यांचा बळी घेण्यात आला त्या विरोधात महाराष्ट्र बंद होता, असे नबाब मलिक यांनी सांगितले.



    या चर्चेत नवाब मलिक यांनी बंदबाबत भाष्य केले. आम्ही शेतकऱ्यांना निर्दयपणे मारण्याच्या कल्पनेच्या विरोधात उभे आहोत असे मलिक म्हणाले. यावेळी अँकर सुशांत सिन्हा याने लोकांना विरोध करू द्या. तुम्ही जबरदस्तीने दुकाने का बंद करीत आहात, असा प्रश्न विचारला त्यावर मलिक यांनी तुम्हाला असे वाटते की हे जबरदस्तीने आहे, तुम्ही निवडक रेकॉर्डिंग दाखवा आमची हरकत नाही, असे म्हटले.

    पण त्याचवेळी राजस्थानमधल्या घटनांचा उल्लेख करून तिथे तुमचा पक्ष आंदोलन करेल का, हा प्रश्न सुशांत सिन्हाने विचारला. या प्रश्नावर नवाब मलिक म्हणाले की आमचा पक्ष तिथे नाही. त्यामुळे तिथे आंदोलन केले नाही. त्यावर सुशांत सिन्हाने ताबडतोब तुमचा पक्ष तर उत्तर प्रदेशातही नाही, हे नबाब मलिकांच्या लक्षात आणून दिले. या मुद्द्यावर मात्र नवाब मलिक चिडले. आंदोलन कुठे आणि कसे करायचे की नाही हे पक्ष ठरवेल… आणि आम्ही कुठे आहोत, असले छिछोर प्रश्न विचारू नका, असे म्हणत नवाब मलिक यांनी आपला कॉलर माईक काढून टाकून ते चर्चेतून निघून गेले.

    Rajasthan – Why don’t you go to Uttar Pradesh and protest ?, Nawab Malik got angry and removed the mic

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ