विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेल्या ३ते ४ दिवसांपासून कल्याणमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कल्याणमधील अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे घटना घडत आहेत. त्यातच कल्याण मधील वालाधुनी परिसरात पावसामुळे ८ ते १० फूट पाणी घरात भरले आहे.Rain Water is the houseas of Kalyan Area; Five Hundred person’s rescued, Ulhas River Overflow
या पाण्यामुळे परिसरात राहणारे नागरिक अडकले होते. अशा ५०० हुन अधिक नागरिकांना रेस्क्यू टीमने सुखरूप बाहेर काढले आहे.कल्याणच्या वालधुनी परिसरात आज पहाटे ४ च्या सुमारास नदी पात्राच्या पाण्यात वाढ झाल्याने घरात ८ ते १० फूट पाणी भरले. कल्याणमध्ये पावसाचा जोर कमी झाला.
परंतु समुद्राच्या भरतीमुळे नदी पात्राचे पाण्याची पात्रता कमी न झाल्याने अनेक नागरिक हे घरांमध्ये अडकले होते. अशा ५०० हून अधिक नागरिकांना कल्याणच्या आपत्कालीन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे.
- उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी
- गेल्या ३ते ४ दिवसांपासून मुसळधार पाऊस
- वालाधुनी ८ ते १० फूट पाणी घरात भरले
- समुद्राच्या भरतीमुळे नदी पात्राचे पाणी वाढले
- आपत्कालीन विभाग, अग्निशमन जवान धावले