विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरण रविवारी शंभर टक्के भरले. मुबलक पाणीसाठा झाल्याने आणि पाणी भरण्याची क्षमता संपल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात आणि कोल्हापूर परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्याचा परिणाम पंचगगा दुथडी भरून वाहिल्याने तिने धोक्याची पातळी ओलांडली आहे.Radhanagari dam filled; Water is Discharge in Bhogavati river basin
आता राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे चार वाजता उघडले आहेत. 3 नंबर आणि 6 नंबरच्या दरवाजामधून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. दोन्ही दरवाजामधून एकूण 4236 क्यूसेक्स पाणी भोगावती नदीपात्रात सोडले आहे.
- राधानगरी धरण शंभर टक्के भरले
- धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे चार वाजता उघडले
- भोगावती पात्रात पाणी सोडले
- मुसळधार पावसाने धरण भरले
- एकूण 4236 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु