विशेष प्रतिनिधी
नागपूर: ज्यावेळी अतिवृष्टी होऊन मोठं नुकसान होत असतं तेव्हा नजर आणीबाणीच्या आधारावरच मदत करता येते. व्यक्तिगत पंचनाम्याची तेव्हा गरज पडत नाही. पंचनामे होत राहतील. पण शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.Prior to the farmers Help immediately
देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली. मंत्री आणि प्रमुख लोकं गेले तर प्रशासन जागं होतं. लोकांना दिलासा मिळतो. कोण तरी आपलं ऐकतं हे लोकांना समजतं. मी सुद्धा उद्या दौऱ्यावर जाणार आहे.
तीन दिवस जाणार आहे. वाशिमपासून माझा दौरा सुरू होत आहे. सरकारला पूरपरिस्थितीची माहिती देऊन जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याचा प्रयत्न करू, असं फडणवीस यांनी सांगितलं.
- नजर आणीबाणीच्या आधारावरच मदत करता येते
- व्यक्तिगत पंचनाम्याची तेव्हा गरज पडत नाही
- पंचनामे होत राहतील. पण शेतकऱ्यांना मदत करा
- मंत्री आणि प्रमुख लोकं गेले तर प्रशासन जागं होतं
- मी सुद्धा उद्या तीन दिवस दौऱ्यावर जाणार आहे
- वाशिमपासून माझा दौरा सुरू होत आहे