महाराष्ट्रासह विरोधी पक्षाची सरकारे असलेल्या सगळ्याच राज्यांमध्ये लसीवरून राजकारण केले जात आहे. केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी लसीचा तुटवडा असल्याचे भासविले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लसींचा डाटाच जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रात पाच लाख लसींचे डोस शिल्लक असून पुढील तीन दिवसांत आणखी पाच लाख डोस केंद्राकडून मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. Politics from Vaccine, Center announces data, Maharashtra has five lakh doses left
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह विरोधी पक्षाची सरकारे असलेल्या सगळ्याच राज्यांमध्ये लसीवरून राजकारण केले जात आहे. केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी लसीचा तुटवडा असल्याचे भासविले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लसींचा डाटाच जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रात पाच लाख लसींचे डोस शिल्लक असून पुढील तीन दिवसांत आणखी पाच लाख डोस केंद्राकडून मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशात १ मे पासून १८ वर्षावरील सगळ्यांना लस दिली जाणार आहे. मात्र लसीची तुटवडा कमी असल्याने अनेक राज्यात लसीकरण होणार नसल्याचं सांगितले जातं आहे. महाराष्ट्रातही १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांचं लसीकरण होणार नाही असे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते. महाराष्ट्रात लसींचा साठी अपुरा असल्याने लसीकरण मोहिमेवर परिणाम होत असल्याचे चित्र निर्माण करून केंद्र सरकारला बदनाम करण्याचा डाव आहे. यावर केंद्रीय मंत्रालयाने भाष्य केले आहे. महाराष्ट्रात २८ एप्रिल सकाळी ८ वाजेपर्यंत १ कोटी ५८ लाख ६२ हजार ४७० लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील ०.२२ टक्के खराब झालेल्या डोससह १ कोटी ५३ लाख ५६ हजार १५१ लसीचे डोस दिले गेले आहेत. आताही राज्याकडे ५ लाखाहून अधिक डोस शिल्लक आहेत. पुढील ३ दिवसांत महाराष्ट्राला ५ लाख लसीचे डोस उपलब्ध केले जातील.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोविड १९ चा १ कोटींहून अधिक लस उपलब्ध असल्याचे सांगितले. त्याचसोबत पुढील ३ दिवसात राज्यांना ५७ लाख ७० हजार लसीचे डोस उपलब्ध केले जातील. केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये १५ कोटी ९५ लाख ९६ हजार १४० लस मोफत उपलब्ध करून दिल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय मंत्रालयाने याबाबतचा डेटा जारी केला आहे. त्यात सध्या राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडे १ कोटींहून अधिक लसीचे डोस उपलब्ध आहेत.
मंगळवारी ४ बिगर भाजपा शासित राज्यांनी १ मेपासून लसीकरण करण्यासाठी तयार नसल्याचं सांगितलं होतं. लसींचा अभाव असल्याने लसीकरण कसं करायचा असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्रालयाने हा डेटा जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे. दिल्लीला ३६ लाख ९० हजार लसीचे डोस दिले आहेत. त्यातील ३२ लाख ४३ हजार ३०० लसीच डोस संपलेत. आताही राज्याकडे ४ लाख ४७ हजार ४१० लसीचे डोस शिल्लक आहेत. यापुढे दिड लाख लसीचे डोस उपलब्ध केले जातील.राजस्थानात आतापर्यंत १ कोटी ३६ लाख १२ हजार ३६० लस उपलब्ध केल्यात.
आता त्यांच्याकडे ३ लाख ९२ हजार लसीचे डोस उपलब्ध आहेत. त्यांना २ लाख लसीचे डोस उपलब्ध करून देणार आहोत. पश्चिम बंगालमध्ये १ कोटी ९ लाख ८३ हजार ३४० डोस दिलेत. त्यातील २ लाख ९२ हजार ८०८ डोस शिल्लक आहेत. तर ४ लाख आणखी डोस उपलब्ध करणार आहोत. छत्तीसगडमध्ये ५९ लाख १६ हजार ५५० लसीचे डोस दिलेत. त्यातील ३ लाख ३८ हजार ९६३ डोस शिल्लक आहेत. त्यांनाही २ लाख लसीचे डोस लवकरच दिले जातील असं केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
Politics from Vaccine, Center announces data, Maharashtra has five lakh doses left
महत्वाच्या बातम्या
- Exit Polls Results 2021 LIVE On The Focus India : आसाम, पुदच्चेरी भाजपकडे, तमिळनाडू द्रमुककडे, केरळ डाव्यांकडे.. पण बंगालमध्ये गौडबंगाल!
- West Bengal The Focus India Exit Poll Results 2021 : पश्चिम बंगालमध्ये सस्पेन्सच… अगदी एक्झिट पोल्स देखील दुभंगलेले! कोणाला काटावरचे बहुमत? की त्रिशंकू विधानसभा?
- Tamil Nadu The Focus India Exit Poll Results 2021 : तमिळनाडूत द्रमुकचा आवाज; स्टॅलिन नवे करूणानिधी
- Assam The Focus India Exit Poll Results 2021 : आसाममध्ये पुन्हा कमळ फुलणार भाजप आघाडीचा काँग्रेसला झटका
- Kerala The Focus India Exit Poll Results 2021 : केरळमध्ये पुन्हा डावी लोकशाही आघाडी सत्तेवर येण्याचा अंदाज
- Puducherry The Focus India Exit Poll Results 2021 : केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीत भाजपची बाजी ; कमळ फुलणार ; काँग्रेसचे स्वप्न भंगणार