• Download App
    सीमेवरील ऑक्सिजन टॅँकर आणि कोल्हापूर- सातारा जिल्हाधिकारी भिडले|Oxygen tanker at the border and Kolhapur-Satara Collector clashed

    सीमेवरील ऑक्सिजन टॅँकर आणि कोल्हापूर- सातारा जिल्हाधिकारी भिडले

    कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यांमध्येही वाद सुरू झाला आहे. ऑक्सिजन कोणाला मिळावा यासाठी कोल्हापूरआणि सातारा जिल्ह्यांतील जिल्हाधिकारीच एकमेंकाशी भिडले.Oxygen tanker at the border and Kolhapur-Satara Collector clashed


    विशेष प्रतिनिधी

    सातारा : कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यांमध्येही वाद सुरू झाला आहे. ऑक्सिजन कोणाला मिळावा यासाठी कोल्हापूरआणि सातारा जिल्ह्यांतील जिल्हाधिकारीच एकमेंकाशी भिडले.

    राज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हा, शहर प्रशासन ऑक्सिजन मिळवण्यासाठी धडपडत आहे. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी सीमेवरुन जाणारा ऑक्सिजन चा टँकर अडवला. यावरुन कोल्हापूर आणि सातारा जिल्हाधिकाºयांमध्ये वाद झाल्याचे पहायला मिळाला.



    ऑक्सिजनचा टँकर आमचाच असल्याचा दावा कोल्हापूर आणि सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. त्यामुळे सध्या टँकर पोलीस बंदोबस्तात उभा आहे. ही घटना साताऱ्याच्या हद्दीवर घडली असून दोन जिल्हाधिकाऱ्यांची उच्च पातळीवर चर्चा झाली.

    ऑक्सिजन टँकरवरुन वाद झाल्यानंतर फोनाफोनी केल्यानंतर तो टँकर सातारचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच वेळी दोन टँकर निघाले होते. एका टँकरचा संपर्क तुटल्यामुळे ही गफलत झाली असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवरुन दिली.

    तर संबधित टँकरचा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाशी काही संबध नाही. तो टँकर कोल्हापुरातल्या प्रायव्हेट उत्पादकाचा आहे. त्यातील आॅक्सिजन कोल्हापूर जिल्ह्यासाठी नाही. कोल्हापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र टँकर येत आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

    Oxygen tanker at the border and Kolhapur-Satara Collector clashed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करायचा निर्धार!!

    पुरोहित संघातील 38 वर्षांची मक्तेदारी संपली, अध्यक्ष पदावरून सतीश शुक्लांची हकालपट्टी; चंद्रशेखर पंचाक्षरींकडे जबाबदारी; आता गोदावरी आरतीचा वाद संपण्याची अपेक्षा!!

    MNS-Thackeray : मनसे – ठाकरे गट युतीबाबत अमित ठाकरे यांचे सूचक वक्तव्य :दोन भावांनी बोललं पाहिजे, आम्ही बोलून काही फरक पडणार नाही