• Download App
    भांडणात मध्यस्थी केल्याने पोलिस कर्मचार्‍याच्या हाताचा घेतला चावा । On police duty constable injured in Quarrel vishrantwadi area

    भांडणात मध्यस्थी केल्याने पोलिस कर्मचार्‍याच्या हाताचा घेतला चावा

    हनुमान जयंती निमित्त कर्तव्यावर असताना चाललेली भांडणे पाहुन मध्यस्थी करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांचा हाताचा एकाने चावा घेतल्याचा प्रकार विश्रांतवाडी येथील एकतानगर येथे घडला. On police duty constable injured in Quarrel vishrantwadi area


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : हनुमान जयंती निमित्त कर्तव्यावर असताना चाललेली भांडणे पाहुन मध्यस्थी करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांचा हाताचा एकाने चावा घेतल्याचा प्रकार विश्रांतवाडी येथील एकतानगर येथे घडला. याप्रकरणी चावा घेणार्‍याला विश्रांतवाडी पोलिसांनी सरकारी कामात अडथळला आणल्याप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.

    बाजीराव बाळु सुकळे (33, रा. कर्वेनगर, कोथरूड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस अमंलदार प्रितम जंगम यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.



    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हनुमान जन्मोत्सवा निमित्त जंगम विश्रांतवाडी येथील एकातानगर येथे कर्तव्यावर हजर असताना त्यांना बाजीराव सुकळे आणि बजरंग दगडे यांच्यामध्ये भांडण व मारामारी सुरू असल्याचे दिसले. जगंम तात्काळ दोघांची भांडणे सोडविण्यासाठी व शांतता आबाधीत राहण्यासाठी धावले. ते त्यांचे काम करीत असताना भांडणे सोडविल्याच्या रागातून सुकळे हा त्यांच्या अंगावर धावून गेला. त्यानंतर त्याने त्यांच्या हाताचा चावा घेत त्यांना जखमी केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. माळी करीत आहेत.

    On police duty constable injured in Quarrel vishrantwadi area

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?