• Download App
    राष्ट्रवादी चिडीचूप्प, एकाकी अनिल देशमुखांसाठी कॉँग्रेस मैदानात|NCP calm, Congress in field for Anil Deshmukh

    राष्ट्रवादी चिडीचूप्प, एकाकी अनिल देशमुखांसाठी कॉँग्रेस मैदानात

    राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणी वाढत असताना राष्ट्रवादी कॉँग्रेसने त्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. राष्ट्रवादीचे सगळे नेते त्यांच्याबाबत चिडीचूप्प आहेत. कॉँग्रेसचे नेते मात्र भाजपाविषयी काविळीने मैदानात उतरले आहेत.NCP calm, Congress in field for Anil Deshmukh


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणी वाढत असताना राष्ट्रवादी कॉँग्रेसने त्यांना वाºयावर सोडून दिले आहे.

    राष्ट्रवादीचे सगळे नेते त्यांच्याबाबत चिडीचूप्प आहेत. कॉँग्रेसचे नेते मात्र भाजपाविषयी काविळीने मैदानात उतरले आहेत.मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.



    सीबीआयनंतर आता या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीच्या कोणीही या प्रकरणावर बोलण्यास तयार नसताना काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे,असा आरोप केला आहे.

    परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपांमुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख वादाच्या भोवऱ्यात सापडेले आहेत. याप्रकरणाची चौकशी सध्या सीबीआय करत असून, आर्थिक व्यवहारासंदभार्तील आरोपांप्रकरणी ईडीने ईसीआयआर (गुन्हा) दाखल केला आहे.

    काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईवरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे.

    करोना हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे तसेच राजकीय सूडबुद्धी ही आहे. परमबीर सिंह यांच्या खोट्या आरोपांवरून कारवाई केली आहे, असे म्हटले आहे.

    सावंत म्हणाले, आरोपांचे विश्लेषण केले तरी सचिन वाझेने १०० कोटी जमवण्यास सांगितले असे म्हटले. परमबीर सिंह यांनी ही तेच म्हटले. पैसे दिले असे आरोपकतेर्ही म्हणत नाही. मग सीबीआय धाडी कशावर टाकत होती?

    पैसे दिलेच नाही तर ईडी कशाला? आणि जर पैसे दिले असे सीबीआय व ईडीचे म्हणणे असेल, तर परमबीर सिंह व वाझेवर कारवाई का नाही? हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे. जनता ही आता हे ओळखून आहे. या राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक झाला आहे.

    NCP calm, Congress in field for Anil Deshmukh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सिंदूर समर्पणाने श्रद्धांजली : वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ललिता सहस्रनाम पूजन आणि सिंदूर वितरण

    Mock drill महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल ; सायरन वाजणार, ब्लॅकआउट असणार

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट