विशेष प्रतिनिधी
मुंबई : त्रिभाषा सक्तीविरोधात शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांनी ५ जुलै रोजी विजयी निर्णय घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी देत राज ठाकरे यांच्याशी पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरेंना छळ करून पक्षाबाहेर घालविले तेव्हा कोठे गेले होते तुमचे प्रेम? अशा शब्दांत त्यांना सुनावले आहे.
राणे यांनी ट्वीट करत म्हटले, “उद्धव ठाकरे सन्माननीय राज जी ठाकरे यांना भाऊबंदकीच्या नात्याने परत येण्यासाठी आवाहन करत आहेत. पण मला आठवतं, हेच उद्धव ठाकरे होते ज्यांनी राज ठाकरे यांना पक्षात डावलले, त्रास दिला आणि शेवटी पक्षाबाहेर जाण्यास भाग पाडले. तेव्हा हे प्रेम कुठे होतं? आता सत्ता गेल्यावर का लाळ ओकत आहेत?”
राणे यांनी स्पष्ट शब्दांत उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या अधोगतीला जबाबदार धरले आहे. “राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे या सर्वांनी शिवसेना वाढवण्यासाठी आयुष्य खर्च केले. पण उद्धव ठाकरे यांनीच सर्वांना बाहेरचा रस्ता दाखवला. जे सत्ता बाळासाहेब ठाकरे यांनी दिली, ती उद्धव ठाकरेंनी गमावली. मराठी माणूस आणि हिंदूंनी त्यांना घरी बसवलं,” असे राणेंनी म्हटले आहे.
राणेंनी ट्विट करून म्हटले, उद्धव ठाकरे सन्माननीय राज जी ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असे म्हणून प्रयत्न करीत आहेत. मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राज जी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं ? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत. सन्माननीय राज जी, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले याने सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसविले.
राज ठाकरे यांनी २००५ मध्ये शिवसेना सोडल्यावर अनेकदा असा आरोप करण्यात आला की त्यांना पक्षात डावलण्यात आलं होतं. हेच अनुभव नारायण राणे, गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्याही वाट्याला आले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे काहींना ‘राजकीय स्वार्थाचे राजकारण’ वाटत आहे, विशेषतः आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून
५ जुलै रोजी हिंदी सक्ती विरोधात होणाऱ्या ‘विजयी मेळाव्या’च्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवाजी पार्कवर होणाऱ्या या जाहीर सभेचा हेतू भाषिक अस्मिता आणि मराठीच्या प्रश्नावर एकत्र लढा उभारण्याचा आहे, असा दावा केला जात आहे. पण विरोधकांनी हे एकप्रकारे ‘राजकीय पुनर्जन्माचा प्रयत्न’ असल्याचे म्हटले आहे
सामान्य जनतेमध्येही सोशल मीडियावरून प्रतिक्रिया उमटत असून, “शिवसेना संपवताना कुठे गेलं होतं हे नातं? आता पुन्हा एकत्र का?”, असे प्रश्न विचारले जात आहेत
हिंदी सक्तीच्या विरोधातील आंदोलनाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मात्र, या राजकीय जवळीकीवर नारायण राणेंसारख्या शिवसेनेच्या माजी नेत्यांकडून केलेली टीका हे दाखवते की शिवसेनेतील जुन्या जखमा अजूनही भरल्या नाहीत
Narayan Rane’s question to Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Manisha Kayande : उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे यांच्या विचारसरणी पूर्णपणे वेगळ्या – मनीषा कायंदे
- India-France : भारत-फ्रान्स संयुक्त लष्करी सराव ‘शक्ती-२०२५’ मुळे भारतीय सैन्याची क्षमता वाढणार
- Kolkata law college : कोलकाता येथील लॉ कॉलेजमधील सामूहिक बलात्कार प्रकरणात चौथी अटक
- Oman : ओमानमध्ये राहणाऱ्या सात लाख भारतीयांचं टेन्शन वाढणार?