• Download App
    Aditi Tatkare अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, कार असणाऱ्या

    Aditi Tatkare : अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, कार असणाऱ्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार; मंत्री अदिती तटकरेंची माहिती

    Aditi Tatkare

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :Aditi Tatkare  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही. मात्र अर्जांची पडताळणी केली जाईल. त्यात कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या व इतर नियमात न बसणारे अर्ज बाद केले जातील. मात्र पूर्वीच्या शासन नियमात कोणताही बदल केला जाणार नाही,’अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.Aditi Tatkare

    मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाल्या, ‘काही अर्जांच्या बाबतीत तक्रारी आल्या होत्या, त्याची आम्ही पडताळणी करत आहोत. आधार कार्ड मिस मॅचच्या तक्रारी होत्या. ज्यांचे आधार कार्डवरील नाव व बँक खात्यावरील नाव जुळत नाही, अशा बहिणींना यापुढे पैसे मिळणार नाहीत. ज्यांच्या नावावर चारचाकी वाहने आहेत, त्यांनीही अर्ज केले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल. ज्यांच्या कुटुंबात आयकर भरला जातो, अशा महिलांची नावेही वगळण्यात येतील, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. काही महिलांकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज आले होते. काही महिलांचे लग्नानंतर दुसऱ्या राज्यात स्थलांतर झाले आहे.



    २१०० रुपये कधी मिळणार, हा प्रश्न अनुत्तरितच

    सध्या राज्यातील २ कोटी ४० लाख महिलांना या योजनेतून दरमहा १५०० रुपये अर्थसाह्य मिळत आहे. जुलैपासून ६ हप्ते जमा करण्यात आले आहेत. ही रक्कम २१०० रुपये करण्याचे आश्वासन महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिले होते. आता त्याची अंमलबजावणी कधी करणार? या प्रश्नाचे उत्तर तटकरे यांनी दिले नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी मिळाल्यानंतर कदाचित ही वाढीव रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

    Minister Aditi Tatkare On CM Ladki Bahin Yojna

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये संभाव्य एन्ट्री, पुढच्या राजकारणातला धोका ओळखून आमदार सीमा हिरे यांचा विरोध; पण निर्णय काय होणार??

    Girish Mahajan : तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले विचारले तर काय होईल? गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर पलटवार

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!