विशेष प्रतिनिधी
मुंबई : Manoj Jarange मुंबईतले मराठा आरक्षण आंदोलन हाताबाहेर गेले. त्या आंदोलनात महिला पत्रकारांची छेड काढली. फक्त आझाद मैदानात 5000 लोकांना आंदोलन करायची परवानगी दिली असताना सगळ्या मुंबईला भेटीला धरले. न्यायमूर्तींच्याही गाड्या अडविल्या. आंदोलनामुळे मुंबईत अराजक निर्माण झाले. त्यामुळे मुंबई पुढच्या 24 तासांत खाली करा आंदोलन फक्त आझाद मैदानापुरते मर्यादित ठेवा, असे स्पष्ट आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर मनोज जरांगे यांच्या वकिलांकडून आंदोलनाची जबाबदारी झटकायला सुरुवात झाली.Manoj Jarange
मराठा आरक्षण आंदोलनात न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा, असे आदेश मनोज जरांगे यांनी आंदोलकांना दिले, पण आंदोलनात काही समाजकंटक घुसलेत. त्यांनी मुंबईच्या रस्त्यांवर अराजक माजविले आहे असा दावा मनोज जरांगे यांचे वकील पिंगळे यांनी करून आंदोलनाची जबाबदारी मनोज जरांगे यांच्या अंगावरून झटकायचा प्रयत्न केला. सरकारने मनोज जरांगे यांची मागणी केली असती, तर आंदोलनाची वेळ झाली नसती. आंदोलक मुंबईत आले नसते. मुंबईकरांना त्यांचा त्रास झाला नसता. पण सरकारने जरांगे यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले म्हणून मराठा आरक्षण आंदोलकांना मुंबईत यावे लागले, असा उलटा आरोप मनोज जरांगे यांचे वकील पिंगळे यांनी केला.Manoj Jarange
मराठा आंदोलनात कोर्टाच्या आदेशानुसार 5000 लोकांनाच आझाद मैदानावर थांबायला मनोज जरांगे यांनी सांगितले होते पण या आंदोलनात काही समाजकंटक घुसले. त्या घुसखोरांच्या सगळ्या वाईट गोष्टी माध्यमांनी दाखविल्या. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन बदनाम होते आहे, असा दावाही वकील पिंगळे यांनी केला.
Manoj jarange trying to escape from responsibility of Maratha agitation in Mumbai
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांची महत्त्वाची चाल, ओबीसी नेत्यांची बोलवली बैठक
- डोनाल्ड ट्रम्पने घेतली होती युरोपियन राष्ट्रप्रमुखांची “शाळा”; पण SCO मध्ये भारत + चीन + रशियासह महत्त्वाच्या राष्ट्रप्रमुखांचा भरला समानता मेळा!!
- Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानवर 50 पेक्षा कमी शस्त्रे डागली; एअर मार्शल म्हणाले- पाकिस्तान घाबरला आणि युद्धबंदीची मागणी करू लागला
- Jaishankar : जयशंकर म्हणाले- युक्रेन युद्धावर भारताला लक्ष्य करणे चुकीचे; आम्ही संवादाच्या बाजूने