• Download App
    सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र बंदचा उडाला फज्जा ; कणकवलीत ८० टक्क्यांपेक्षा अधिक दुकाने सुरु|Maharashtra bandh blows up in Sindhudurg district; More than 80% shops started in Kankavali

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र बंदचा उडाला फज्जा ; कणकवलीत ८० टक्क्यांपेक्षा अधिक दुकाने सुरु

    विशेष प्रतिनिधी

    सिंधुदुर्ग : कणकवली महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘हरताळ’ फासला गेला आहे. ८०% पेक्षा अधिक दुकाने सुरू असून कणकवलीत बंदला फारसा प्रतिसाद लाभला नाही.Maharashtra bandh blows up in Sindhudurg district; More than 80% shops started in Kankavali

    उत्तरप्रदेश लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मात्र जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या कणकवली बाजारपेठेत याचा फारसा परिणाम जाणवला नाही.



    व्यापारी मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाले आहेत. तर काही ठिकाणी जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला थंड प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दुकानदारांना बंदात सहभागी आवाहन केले होते. मात्र, काही ठरावीक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली होती.

    कणकवलीत मात्र, महाविकास आघाडीने दुकाने बंद करायला भाग पाडले. पण, त्यालाही अत्यल्प प्रतिसाद मिळला. कणकवलीत महाविकास कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि बाजारपेठेत फेरफटका मारत दुकान बंद करायला लावली.

    यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने दुकाने बंद केली. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीत नेतृत्व केलं. एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंदचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र आहे.

    Maharashtra bandh blows up in Sindhudurg district; More than 80% shops started in Kankavali

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अष्टसूत्री प्रगतीची, अष्टावधानी नेतृत्वाची; घड्याळापुढे शरणागती तुतारीची!!

    Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, 14 जानेवारीपूर्वी 3 हजार येणार, मकरसंक्रांती-निवडणूक जुळल्याने विरोधक आक्रमक

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले- राज ठाकरे सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, वारसा नाही, उद्धव ठाकरेंवरही निशाणा