• Download App
    महाराष्ट्र आणि केरळच देशापुढील सर्वात मोठा धोका, कोरोना रुग्णांची संख्या कमी होईना Maharashtra and Kerala are the biggest threats to the country, the number of corona patients has not decreased

    महाराष्ट्र आणि केरळच देशापुढील सर्वात मोठा धोका, कोरोना रुग्णांची संख्या कमी होईना

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरेना महामारीमध्ये महाराष्ट्र आणि केरळ ही दोन राज्येच देशापुढील सर्वात मोठा धोका असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही राज्यांती कोरोना रुग्णांची संख्या कमीच होईनासी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत या दोन राज्यांतच सर्वाधिक कोरोना बाधित आढळले आहेत. Maharashtra and Kerala are the biggest threats to the country, the number of corona patients has not decreased

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांत देशांतील कोरोना संसर्गाचे निम्म्याहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. या राज्यात एकूण 53 टक्के प्रकरणे आढळली आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात सर्वाधिक (9,083) आणि केरळमध्ये (13,772) रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त सक्रिय प्रकरणे देखील येथेच आहेत.



    विशेष म्हणजे या दोन्ही राज्यांत भाजपेतर पक्षांचे राज्य आहे. महाराष्ट्रात शिवसेना- राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आहे. केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या डाव्या आघाडीचे सरकार आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून याच दोन राज्यांत सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत

    आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव्ह अग्रवाल म्हणाले की, 3 जुलै रोजी महाराष्ट्रात 8,700 हून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली. जे 6 जुलैला कमी होऊन 6,700 च्या जवळपास आले. यानंतर, दररोज यापेक्षा जास्त नवीन प्रकरणे आढळली. त्याच वेळी, 2 जुलै रोजी केरळमध्ये 12,800 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली, जी 6 जुलैला 8,300 च्या जवळ आली. यानंतर, दररोज यापेक्षा अधिक प्रकरणे आढळली.

    लव्ह अग्रवाल म्हणाले की कोरोनामधील नवीन प्रकरणांपैकी 80% प्रकरणे 90 जिल्ह्यांमध्ये आहेत. 66 जिल्ह्यात 8 जुलैला पॉझिटिव्हिटी रेट 10% पेक्षा जास्त होता. ते म्हणाले की, दररोज नवीन प्रकरणांमध्ये घट होणे सुरू आहे. गेल्या एका आठवड्यात दररोज नवीन प्रकरणांमध्ये सरासरी 8 टक्के घट झाली आहे.

    निती आयोगाचे अध्यक्ष व्ही. के. पॉल म्हणाले की आम्ही सुरक्षा कमी करू शकत नाही. पर्यटनस्थळांवर एक नवीन जोखीम दिसून येत आहे, जिथे गर्दी जमण्याचे प्रमाण वाढले आहे. तेथे सोशल डिस्टसिंगचे पालन केले जात नाही किंवा मुखवटा घातलेले लोकही नाहीत. ही चिंतेची बाब आहे. जर हे असेच चालू राहिले तर तिसरी लाट देखील येऊ शकते.

    Maharashtra and Kerala are the biggest threats to the country, the number of corona patients has not decreased

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    माळेगावची निवडणूक शरद पवारांनीच अजितदादांना जिंकून दिल्याची मराठी माध्यमांची टिमकी; प्रत्यक्षात पवारांची ताकद मते फोडण्यापुरतीच उरली!!

    Malegaon sugar factory election result 2025 अजितदादांना नको असलेले चंद्रराव तावरे विजयी; माळेगावच्या कारखान्यात चालणार नाही मनमानी!!

    Jio Adani Partnership : जिओ पंपांवर मिळेल अदानींची CNG; अदानी गॅस स्टेशनवर जिओच्या पेट्रोल-डिझेलची विक्री, ATGL-रिलायन्स BPची भागीदारी