• Download App
    मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलचा प्रवास आता सर्वसामान्य मुंबईकरासाठी खुला। Local for every citizen stated in Mumbai

    मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलचा प्रवास आता सर्वसामान्य मुंबईकरासाठी खुला

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्य सरकारच्या सूचनेनुसार कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांचा मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधून प्रवास सुरू झाला आहे. या प्रवाशांचा प्रवास सुरू झाल्याने उपनगरी मार्गावर पूर्ण क्षमतेने लोकल धावणार आहेत. Local for every citizen stated in Mumbai

    एप्रिलअखेरपासून ते १४ ऑगस्टपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा खुली होती. यापुढे लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने लोकल फेऱ्या वाढविण्याचे नियोजन सुरू आहे. सध्या मध्य रेल्वेवरून आणि पश्चिम रेल्वेवरून ९० टक्के क्षमतेने लोकल धावत होत्या, तर १६ आणि १७ ऑगस्टपासून यामध्ये वाढ केली जाणार आहे.



    मध्य रेल्वेवर कोरोनापूर्वी १७७४ लोकल फेऱ्या धावत होत्या, तर आता १६१२ फेऱ्या धावत आहेत. गर्दीचा आढावा घेऊन फेऱ्यांबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे मध्य रेल्वेने सांगितले. पश्चिम रेल्वेवर कोरोनापूर्वी १३६७ लोकल फेऱ्या होत होत्या, तर एप्रिलनंतर फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी १४ ऑगस्टपर्यंत एकूण १२०१ फेऱ्या धावत होत्या; मात्र उद्यापासून (ता. १६) १३०० फेऱ्या धावणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

    Local for every citizen stated in Mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !