• Download App
    अमानुष वागणूक मिळणाऱ्या 69 ऊस कामगारांची सुटका केली कोल्हापूर पोलिसांनी | Kolhapur police rescues 69 sugarcane cutting workers

    अमानुष वागणूक मिळणाऱ्या ६९ ऊस कामगारांची सुटका केली कोल्हापूर पोलिसांनी

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे. मध्यप्रदेश मधील गुना जिल्ह्यातून कोल्हापूरमध्ये काम करण्यास आलेल्या कामगारांना ओलीस ठेवल्याची घटना घडली आहे. त्या कामगारांना ऊसाच्या शेतामध्ये काम करायला लावले, ऊसतोडणी करून घेतली आणि त्या बदल्यात त्यांना फक्त जेवण देण्यात आले. त्यांना विणावेतन काम करण्यास भाग पाडले.

    Kolhapur police rescues 69 sugarcane cutting workers

    कागलमधील तालुक्यातील नदीकाठी असलेल्या एका गावामध्ये ही घटना घडलेली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 16 नोव्हेंबर रोजी सहारिया जमातीतील सुमारे 69 महिला, पुरुष आणि मुले कोल्हापूर जिल्ह्यात मजुरीच्या शोधामध्ये आले होते.

    त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेत विनावेतन त्यांच्याकडून भरपूर काम करून घेण्यात आले होते. आणि विरोध केल्यावर त्यांना गावकऱ्यांनी ओलीस ठेवले. त्यांचे येणे जाणे आणि फिरणे देखील बंद केले होते. अडकलेल्या मजूरांपैकी कोणालाही आपल्या नातेवाईकांसोबत बोलू दिलं जायचं नाही. तेव्हा काही लोकांनी गुप्तपणे गुनामधील आपल्या नातेवाईकांना या सर्व घटनेची माहिती दिली.


    Afghanistan Rescue Operation: अफगानिस्तान मध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ‘देवदूत’ Indian Air Force


    जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एका स्पेशल पथकाने जिल्ह्यांमध्ये या कामगारांचा शोध घेतला. तपासादरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील नदीकाठच्या गावांत त्यांना हे कामगार आढळून आले. पोलिस पथकाने गावात जाऊन तपासणी केली. त्यांनी एकूण 69 व्यक्तींची येथून सुटका केलेली आहे. महिला पुरुष लहान मुले असा सर्वांचा या समावेश आहे. पोलिसांनी मजुरांची सुटका करून त्यांना सुखरूप परत गुना येथे पाठवले आहे.

    Kolhapur police rescues 69 sugarcane cutting workers

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ₹993 कोटींच्या कामांना मान्यता

    राष्ट्रवादी वाले रणनीती बदलतील, रणनीतीकार बदलतील; पण “विश्वास” नावाचा शब्द कुठून आणतील?? आणि भाजप आणि शिंदे काय शेंगांची टरफलं सोलत बसतील काय??

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना