• Download App
    Jayanta Patil claims he has no unrest in Sharad Pawar NCP राष्ट्रवादीत अस्वस्थ असलेल्या जयंत पाटलांना बाहेर

    राष्ट्रवादीत अस्वस्थ असलेल्या जयंत पाटलांना बाहेर बोलायची झाली चोरी; बारामतीत जाऊन स्वतःच दिली कबुली!!

    Jayanta Patil

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थ असलेल्या जयंत पाटलांना बाहेर बोलायची झाली चोरी बारामतीत जाऊन स्वतः दिली कबुली!!, असे आज बारामतीत घडले.Jayanta Patil claims he has no unrest in Sharad Pawar NCP

    शक्तीपीठ महामार्गाबाबत राजू शेट्टींनी आयोजित केलेल्या आंदोलनात जयंत पाटलांचे भाषण झाले होते. त्यावेळी त्यांनी माझी काही गॅरेंटी नाही घेऊ नका, पण शक्तीपीठ महामार्गाचे आंदोलन राजू शेट्टींच्या हातात असल्याने तुम्ही त्यांच्या पाठीशी ठाम राहा, असे जयंत पाटलांनी आंदोलन शेतकऱ्यांना सांगितले होते. परंतु त्याच दरम्यान अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे एक वक्तव्य समोर आले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील अस्वस्थ आहेत. पुढची पाच वर्ष विरोधकांमध्ये कशी काढायची याची त्यांना चिंता लागून राहिली आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले त्यामुळे जयंत पाटलांच्या राजकीय भूमिकेविषयी संशय अधिक गहिरा झाला.



    त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटलांची भेट घेऊन त्यांच्याशी एक तास चर्चा केली. जयंत पाटील आज बारामतीत पोहोचले. तिथे त्यांनी कृषी प्रदर्शन अशी संबंधित असलेल्या गोष्टींची पाहणी केली. शरद पवारही तिथे हजर होते. त्यानंतर पत्रकारांची बोलताना खुलासा केला. मी राष्ट्रवादीत अस्वस्थ वगैरे काही नाही. आम्ही शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करतो. जो काही निर्णय घेऊ तो पक्षाचा हिताचा घेऊ पण सध्याच्या वातावरणात मला बाहेर बोलायची चोरी झाली आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

    कुठल्याही महामार्गासाठी सरकारने भरपाईची रक्कम वाढवली की शेतकरी भरपाई घेऊन मोकळे होतात आणि जमिनी देऊन टाकतात. त्या संदर्भात मी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातल्या आंदोलनात बोललो होतो. तेव्हा मी माझी गॅरंटी घेऊ नका, असे म्हटलो होतो, पण राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आंदोलन सुरू ठेवा असेच शेतकऱ्यांना सांगितले होते अशी पुस्ती जयंत पाटील यांनी जोडली.

    Jayanta Patil claims he has no unrest in Sharad Pawar NCP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Devendra Fadnavis : कधीकाळी याचकाच्या भूमिकेत असलेल्या भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

    विधान परिषद निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादी सकट विरोधकांना नाही संधी; रोहित पवारांची निवडणूकच पुढे ढकलायची मागणी!!

    महाराष्ट्रात गाईंची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर चालणार बुलडोझर; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा