विशेष प्रतिनिधी
मुंबई : राहूल गांधी हिंदू असल्याचे सांगतात तर त्यांनी मोगलांनी हिंदू मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रमाणे मंदिरांची पुनर्स्थापना करत आहेत त्याप्रमाणे कार्य करावे, असे आव्हान भाजपाचे खासदार चंद्रकांत पाटील यांनी राहूल गांधी यांना दिले आहे.If Rahul Gandhi is a Hindu, he should protest against the attack on Hindu temples by the Mughals, Chandrakant Patil’s challenge
देशात 2014 पासून हिंदुत्ववाद्यांची सत्ता आहे. हिंदूंची सत्ता नाही. त्यामुळे या हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून बाहेर काढा. देशात पुन्हा हिंदुंची सत्ता आणा, असं वक्तव्य काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी नुकतेच केले आहे.यावर पाटील म्हणाले की, राहुल गांधी यांचे वक्तव्य त्यांचा संभ्रम दर्शविते.
हिंदू आणि हिंदुत्ववादी यात काय फरक आहे ? हिंदू धर्म म्हणजे विशिष्ट एकच पूजा पद्धती नाही, तर हिंदू हा गुणवाचक शब्द आहे. जो हिंदू तत्त्वज्ञानाचा आग्रही असतो तो हिंदुत्ववादी असतो. या देशात हिंदू समाजात वेगवेगळ्या पूजा पद्धती निर्माण झाल्या आणि मंदिरे निर्माण झाली. त्यावर मोगलांनी आक्रमण केले. राहुल गांधी स्वत:ला हिंदू म्हणत असतील तर त्यांनी मोगलांनी मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध केला पाहिजे.
पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सच्चे भारतीय आणि सच्चे हिंदुत्ववादी आहेत. काशीला गंगेत स्नान करून विश्वनाथ मंदिरात दर्शनाला येताना प्रचंड गर्दी होत होती आणि मंदिराभोवती प्रदूषण व सांडपाणी होते. ते हटविण्याचा संकल्प त्यांनी पूर्ण केला.
आता मंदिराच्या भोवती पाच लाख चौरस फुटांचा सुंदर परिसर निर्माण झाला आहे. भाविकांना मोकळेपणाने वावरण्यासाठी जागा आहे. गंगेत स्नान करून भाविक थेट मंदिरात येऊ शकतात. मोदीजींनी अयोध्येतील राम मंदिराचा विषय मार्गी लावला आहे.
केदारनाथ येथे शंकराचायार्चा पुतळा उभारून समाधीचे काम केले आहे तसेच मंदिर परिसरात मोठी विकास कामे केली आहेत. ते एका पाठोपाठ एका मंदिराचे काम करत आहेत. हा त्यांचा भावनिक अजेंडा आहे.
If Rahul Gandhi is a Hindu, he should protest against the attack on Hindu temples by the Mughals, Chandrakant Patil’s challenge
महत्त्वाच्या बातम्या
- काशी विश्वनाथ कॉरिडाॅर प्रमाणेच कोलकात्याचा कालीघाट ममतांनी विकसित करावा; भाजपची मागणी
- राहुल गांधींच्या मुंबईतील रॅलीसाठी काँग्रेसची आपल्याच महाविकास आघाडी सरकार विरोधात हायकोर्टात धाव!!
- राज्यांचा विकास आणि गुड गव्हर्नन्सवर भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींसमोर काशीमध्ये आज प्रेझेन्टेशन
- लबाडांना रोखण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी कडक नियमावली जारी
- कॉँग्रेस १० वर्षांत ५० हून अधिक निवडणुका हारली, प्रशांत किशोर यांची टीका