• Download App
    गुलाबराव पाटलांचा प्रतिटोला : वेळ आली की संजय राऊतांनाही चुना लावू!!Gulabrao patil targets Sanjay Raut

    गुलाबराव पाटलांचा प्रतिटोला : वेळ आली की संजय राऊतांनाही चुना लावू!!

    प्रतिनिधी

    मुंबई : गुलाबराव पाटील हे आमदार होण्याआधी पानटपरी चालावायचे त्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले. मात्र त्यांना पुन्हा पानटपरीवर बसवू, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला होता. त्यालाच प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटलांनी वेळ आली की संजय राऊत यांना पण चुना लावू, असा राऊतांना प्रतिटोला हाणला आहे. Gulabrao patil targets Sanjay Raut

    गुवाहाटीतील रेडिसन ब्लू हॉटेल येथे बंडखोर आमदारांच्या समोर बोलताना गुलाबराब पाटील म्हणाले, संजय राऊत सांगतात टपरीवर पुन्हा पाठवू, चूना कसा लावतात हे अजून त्यांना माहिती नाही, वेळ येईल तेव्हा आम्ही संजय राऊतांना चुना लावू, असा टोला देखील यावेळी त्यांनी लगावला.

    आमची परिस्थिती नसातानाही आम्ही उद्धव ठाकरेंसाठी भरपूर केले, हे जे मिळाले आहे ते निश्चितच त्यांच्या आशीर्वादाने मिळाले आहे. पण आमचाही त्यामध्ये त्याग आहे. आम्ही आमच्या घरादारावर तुळशी पत्र ठेवून काम केले आहे. आम्ही आयत्या बिळावर नागोबावाले नाहीत, संजय राऊत सांगतात टपरीवर पुन्हा पाठवू, चूना कसा लावतात, हे त्यांना माहिती नाही अजून, जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही संजय राऊतांना चुना लावू, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे.

    आमचा जीवनातील संघर्ष बोलणाऱ्यांना माहिती नाही. ९२ च्या दंगलीत मी, दोन भाऊ आणि माझे वडील तुरूंगात होतो, तेव्हा राऊत कुठे होते, कलम ५६, ३०२ काय असते हे राऊतांना माहित नाही. रस्त्यावर पायी चालणं काय असतं हे त्यांना माहित नाही, ते आम्ही भोगलंय. हे फक्त बाळा साहेबांचा फोटो लावून मोठे झालेले चित्र आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले कार्यकर्ते आहोत. सभागृहातील डिबेटमध्ये ३९ आणि ११-१२ अपक्ष हे त्यांच्यासाठी पुरेसे आहोत. त्यांनी वर्षा सोडली, त्यांनी आमदारांना सोडलं पण ते शरद पवारांना सोडण्यास तयार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

    Gulabrao patil targets Sanjay Raut

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bhumi Abhilekh : राज्यात भूमी अभिलेखची 50 नवी कार्यालये हाेणार:संभाजीनगरसह चार जिल्ह्यांत अधीक्षक कार्यालये

    Shashikant Shinde : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपलाय, शरद पवार गटाच्या बैठकीनंतर शशिकांत शिंदेंचे मोठे विधान

    CM Devendra Fadnavis : मोदींवर विनाकारण टीका नको, पवारांचे विधान महत्त्वाचे; विधान परिषद महायुती एकत्रित लढणार, इंधनाचा तुटवडा नाही, जनतेने घाबरू नये- सीएम फडणवीस