विशेष प्रतिनिधी
मुबंई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई महानगर भागातील भविष्यामध्ये वाहतुकीच्या आराखड्याबाबत आयोजन करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक वाहतूकीने प्रवास करणार्या प्रवाशांचे घटते प्रमाण ही बाब चिंतेची असून या गोष्टीवर चर्चा करणे हा मुख्य विषय या कार्यशाळेमध्ये होता. सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढावे यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मार्फत भक्कम पावले उचलली जात आहेत. असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
Fuel price hike is good for common people – Chief Minister Uddhav Thackeray
यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अतिशय मिश्किल भाषेमध्ये केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘इंधन दरवाढ ही सर्वसामान्यांच्या भल्यासाठी केली आहे.’ असा टोला त्यांनी लगावला.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, कुणालाही ट्राफिकमध्ये गाडी चालवायला आवडत नाही. सार्वजनिक वाहतुकीमध्ये प्रवाशांचे प्रमाण कमी होत आहे. बहुतेक हे केंद्र सरकारच्या लक्षात आले असावे. आणि म्हणून त्यांनी इंधन दरवाढ केली आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढले हे आपल्या भल्यासाठीच आहे. तुम्हाला वाटत असावे, मी टीकात्मक बोलतोय. पण तुम्ही सांगा वाढलेले इंधनाचे दर परवडले नाहीत तर लोक सार्वजनिक वाहतूकीकडे वळतातच. त्यामुळे चांगल्या हेतूने इंधनवाढ होत असेल तर आपण लक्षात घेत नाही. असे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.
Fuel price hike is good for common people – Chief Minister Uddhav Thackeray
महत्त्वाच्या बातम्या
- राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना कन्नडसक्ती नको , कर्नाटक उच्च न्यायालयाचे मत
- कोरोना लसीकरणात मागास जिल्ह्यांमध्ये ‘हर घर दस्तक’ केंद्र सुरू होणार
- शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याकडून केली ७५ कोटींची मागणी , मानसिक छळाचा केला आरोप
- पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतायत; सोनारपूर नगरपालिका क्षेत्रात आजपासून तीन दिवसांचा लॉकडाऊन