• Download App
    मारुती, हुंडाई, टोयाटाच्या विक्रीला लागला करकचून ब्रेक, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे भयंकर परिणाम।Four wheller market down due to corona second wave

    मारुती, हुंडाई, टोयाटाच्या विक्रीला लागला करकचून ब्रेक, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे भयंकर परिणाम

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोनामुळे कारविक्रीच्या गतीला चांगलाच ब्रेक लागला आहे. अनेक राज्यांनी लावलेल्या लॉकडाऊनचा मोठा परिणाम वाहन विक्रीवर झाला आहे. बड्या वाहन उत्पादक कंपन्यांच्या वाहनविक्रीमध्ये एप्रिल महिन्यात चांगलीच घट झाली. Four wheller market down due to corona second wave

    गेल्या वर्षी कोरोना संसर्गाचा वाहन विक्रीवर मोठा परिणाम झाला होता; मात्र नंतर कंपन्यांनी हळूहळू पिकअप घेतला होता. कोव्हिड संसर्गाच्या भीतीने अनेकांनी खासगी वाहनांना प्राधान्य दिले. त्यामुळे कार खरेदीला वेग आला.



    अगदी यंदाच्या मार्चपर्यंत तो कायम होता; मात्र एप्रिलमध्ये देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याने अनेक राज्यांनी लावलेल्या लॉकडाऊनमुळे वाहनांची वाहतूक करण्यातही अडचणी निर्माण झाल्या. या सर्वांचा एकंदरीत परिणाम वाहन विक्रीवर झाला.

    देशातील सर्वांत मोठी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने एप्रिलमध्ये १,५९,६९१ कारची विक्री नोंदवली. त्यापैकी देशात १,३५,८७९ कार विकण्यात आल्या. पाच महिन्यांतील मारुतीने नोंदवलेली ही सर्वांत कमी वाहन विक्री आहे.

    टोयोटा किर्लोस्करची वाहनविक्रीही ५,३७९ ने कमी झाली आहे. एमजी मोटर्सची वाहनविक्रीही अर्ध्यावर आली आहे. केवळ महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने वाहनविक्रीत सातत्य ठेवले आहे. हुंडाई मोटरने एप्रिल महिन्यात ४९,००२ कारविक्रीची नोंद केली आहे. चार महिन्यांतील त्यांचा वाहनविक्रीचा हा नीचांक आहे. देशातील तिसरी बडी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सच्या वाहनविक्रीत साडेचार हजारांनी घट झाली आहे.

    Four wheller market down due to corona second wave

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi High Court : दिल्ली उच्च न्यायालयाने विचारले- संपूर्ण टेलिग्रामवर बंदी का घातली?:सरकारचा दावा- हे गुन्हेगारांचे आवडते व्यासपीठ, म्हणून NEET च्या पुनर्परीक्षेपूर्वी बंदी घातली

    तुतारीवाले स्वतःचेच ऑपरेशन करतील; घड्याळाच्या नेत्याने सांगितले राजकीय सत्य!!

    Bachchu Kadu : ऑपरेशन टायगरनंतर पुढचा डाव; ‘खासदारांनंतर आता आमदारही येतील’, बच्चू कडूंचा दावा, उद्याच्या कार्यक्रमात 6 बंडखोर खासदार गैरहजर राहणार?