• Download App
    राणा दाम्पत्यावर देशद्रोहाची केस लावली, पण सरकारी वकील सिद्ध नाही करू शकले : रिझवान मर्चंट For the first time, public prosecutor Pradip Gharat, obviously on instructions from the police dept,

    Navneet Rana : राणा दाम्पत्यावर देशद्रोहाची केस लावली, पण सरकारी वकील सिद्ध नाही करू शकले – रिझवान मर्चंट

    वृत्तसंस्था

    मुंबई : मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पंगा घेणाऱ्या राणा दाम्पत्यावर पोलिसांच्या सूचनेनुसार सरकारी वकील प्रदीप घरत यांनी 124 ए अर्थात देशद्रोहाची केस लावली. परंतु त्यातले ते काहीही सिद्ध करू शकले नाहीत, असे प्रतिपादन राणा दांपत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी केले. For the first time, public prosecutor Pradip Gharat, obviously on instructions from the police dept,

    राणा दाम्पत्यावर 124 ए सह विविध कलमांखाली आरोप लावण्यात आले आहेत. यातला 124 ए देशद्रोहाच्या आरोपाचे कलम आहे. परंतु राणा दाम्पत्याने सरकार विरोधात कुठले उद्गार काढल्याचे दाखवून द्या, असे आव्हान आम्ही कोर्टात दिल्यानंतर सरकारी वकील प्रदीप घरत राणा दांपत्याचे तसे एकही वक्तव्य दाखवू शकले नाहीत.

     

    राणा दांपत्याचा फक्त हनुमान चालीसा म्हणण्याचा आग्रह होता बाकी कोणतेही वक्तव्य त्यांनी केलेच नव्हते. त्यामुळे ते प्रत्यक्ष एफआयआरमध्ये लिहिले नाही. त्यामुळे सरकारी वकील ते कोर्टात सादर करू शकले नाहीत, असे रिझवान मर्चंट यांनी स्पष्ट केले आहे.

    सरकार विरुद्ध राणा दाम्पत्याने एकही शब्द उच्चारलेला नसताना त्यांच्यावर 124 ए कलम लागू होऊ शकत नाही, असा युक्तिवाद रिझवान मर्चंट यांनी केला आहे. त्यानंतरच राणा दांपत्याला पोलीस कोठडी ऐवजी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

    For the first time, public prosecutor Pradip Gharat, obviously on instructions from the police dept,

    Related posts

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!