• Download App
    औरंगाबाद येथे साकारणार पंचतारांकित शाळा ; सामाजिक न्याय विभागाची घोषणा। Five star school to be set up at  Aurangabad ; Announcement of the Department of Social Justice

    औरंगाबाद येथे साकारणार पंचतारांकित शाळा ; सामाजिक न्याय विभागाची घोषणा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : औरंगाबाद येथे सामाजिक न्याय विभागाच्या 11 एकर जागेत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी एक पंचतारांकित शाळा सुरू करण्यात येणार आहे. याबाबत घोषणा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. Five star school to be set up at  Aurangabad ; Announcement of the Department of Social Justice

    सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील विविध योजना, विधानसभा सदस्यांच्या त्यानुरूप असलेल्या मागण्या यासंबंधी विधानसभा सभागृहात आयोजित अनुदान मागण्यांवरील चर्चेला धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले.

    दरम्यान, सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीच्या कामास गती देण्यात आली असून, स्वाधार शिष्यवृत्ती, परदेश शिष्यवृत्ती आदी योजनांच्या कक्षा रुंदावल्या असून, यासाठी कुठेही निधीची अडचण भासणार नाही, असेही मुंडे यांनी सांगितले.



    मुंडे यांनी विभागामार्फत दिव्यांग, ऊसतोड कामगार, तृतीयपंथीय यांसह विविध लाभार्थी समाज घटकांसाठी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या योजना व खर्च केलेल्या निधीची माहिती सभागृहाला दिली.

    सामाज न्याय विभागातील योजना सर्वसामान्य गरजूंना लाभदायक आहेत. या सर्व योजनांचा बारकाईने अभ्यास करून नावीन्यपूर्ण रीतीने व कालानुरूप सकारात्मक बदल केल्याने या योजनांचा लाभ खऱ्या गरजू पर्यंत पोहचाव्यात असे नियोजन सामाजिक न्याय विभागाने केली असल्याचे मुंडे यांनी नमूद केले.

    Five star school to be set up at  Aurangabad ; Announcement of the Department of Social Justice

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?