वृत्तसंस्था
मुंबई : पहिल्याच पावसात लोकल वाहतूक बंद पडली. रस्तेही पाण्याखाली गेल्याने बेस्ट, टॅक्सी, रिक्षांसह सार्वजनिक वाहतूक कोलमडली.त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले. हे चित्र राज्याची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे आहे. जागोजागी पाणी साठत आहे. मग, महानगरपालिकेने नेमकी कोणती पावसाळी कामे केली ? असाच प्रश्न जनतेला पडतो आहे. First rains in Mumbai; Local, Best Jam, What about Rainy work ? मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मान्सूनने मुंबईसह महामुंबई परिसराला जोरदार दणका दिला.
अनेकांच्या घरात शिरले पाणी; वाहतूकही मंदावली
ठाणे जिल्ह्यात पावसामुळे अनेक मुख्य रस्त्यांसह चौकाचौकांमध्ये पाणी तुंबले, तसेच गटारे व नाल्यांची सफाई व्यवस्थित न झाल्याने दिवा, मुंब्रा, कल्याण पूर्व, भिवंडी शहरातील अनेक घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले. वीजपुरवठाही खंडित झाला होता. भिवंडी-मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक मंदगतीने सुरू आहे. दरम्यान, मुंबईतील परिस्थितीचा आढाव्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला दुपारी भेट दिली. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासह विविध कार्यवाहीबाबत त्यांनी निर्देश दिले.
First rains in Mumbai; Local, Best Jam, What about Rainy work ?
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईत पावसाचा कहर : मालवणी भागात 4 मजली इमारत कोसळून 11 ठार, 7 जखमी; 15 जणांना वाचविण्यात यश
- ‘पावनखिंड’चा थरार लवकरच रसिकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार
- जगभरात इंटरनेट सेवा अचानक झाली ठप्प, खासगी कंपनीमुळे फटका बसल्याचा दावा
- शेतकरी हिताला केंद्र सरकारने नेहमीच प्राधान्य, चर्चा करण्यास केव्हाही तयार
- हिमालयाच्या बर्पाच्छादित पर्वतरांगात मानवाचे पाच हजार वर्षांपासून वास्तव्य
- दानशूर व्यक्तीच्या एक कोटींच्या मदतीमुळे भारतीयाची मृत्युदंडाच्या शिक्षेतून सुटका
- राणी एलिझाबेथ यांच्या ७० वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीला अवघा ब्रिटन करणार सलाम
- लसीकरणाच्या जोरावर इस्राईल बनला जगातील पहिला कोविडमुक्त देश
- आसाममध्ये शेकडो चहामळ्यांत कोरोनाची एंट्री, मजुरांना मोठ्या प्रमाणात लागण