• Download App
    "अजिबात खचून जाऊ नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे" ; बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना दिला दिलासा Don't be discouraged, the government stands firmly behind the farmers"; Bachchu Kadu gave relief to the farmers

    “अजिबात खचून जाऊ नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे” ; बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना दिला दिलासा

     

    अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दरम्यान त्याचा पंचनामा तात्काळ करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आले आहेत.Don’t be discouraged, the government stands firmly behind the farmers”; Bachchu Kadu gave relief to the farmers


    विशेष प्रतिनिधी

    अकोला – काल बच्चू कडू अकोला दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. संवाद साधताना ते म्हणाले की ,अवकाळी पाऊस व गारपिटीने ज्या शेतकऱ्यांचे तसेच अन्य नागरिकांचे नुकसान झाले असेल तर त्यांनी अजिबात खचून जाऊ नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशा शब्दात अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.



    पुढे बच्चू कडू म्हणाले की, जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दरम्यान त्याचा पंचनामा तात्काळ करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आले आहेत.तसेच यंत्रणा आपल्या बांधावर येऊन पंचनामा करुन अहवाल सादर करेल. त्यानुसार शक्य तितक्या लवकर मदत मिळवून देऊ शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल.

    Don’t be discouraged, the government stands firmly behind the farmers”; Bachchu Kadu gave relief to the farmers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Shinde : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची पत्रकार परिषद; इंडिया आघाडी आणि उद्धव ठाकरेंवरही टीका

    Abdul Sattar : जिल्हा बँक निवडणुकीत अब्दुल सत्तारांना मोठा धक्का! मुलगा समीरचा अर्ज बाद; “देवेंद्रजी योग्य न्याय करतील”, सत्तारांचा विश्वास

    CM Eknath Shinde : ‘इंडिया आघाडी मोदीद्वेषातून जन्माला आली’; दिल्लीतून एकनाथ शिंदेंचा घणाघात, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी वाढवली उत्सुकता