विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर :Dhananjay Munde वंजारी समाजाचे 2 टक्के आरक्षण काढून घेण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही टक्क्यातही ठेवणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या या इशाऱ्यामुळे मराठा आरक्षणामुळे निर्माण झालेला वाद अधिकच चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे.Dhananjay Munde
अहिल्यानगरच्या पाथर्डी – शेवगाव येथे वंजारी समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्याच्या मागणीसाठी काही तरुणांनी उपोषण सुरू केले होते. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी या तरुणांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी तरुणांनी धनंजय मुंडे यांच्याशी बोलणे करून देण्याचा आग्रह धरला. त्यावर ढाकणे यांनी थेट धनंजय मुंडे यांना फोन लावला. त्यानंतर मुंडे यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधून मनोज जरांगे यांना आमचे दोन टक्के काढून घेण्याची वल्गना करणाऱ्यांना टक्क्याही ठेवणार नाही असा इशारा दिला.\Dhananjay Munde
आमचे 2 टक्के काढणाऱ्यांना टक्क्यातही ठेवणार नाही
धनंजय मुंडे म्हणाले, हैदराबाद गॅझेटियर समोर आले नसते, तर आपण वंजारी समाज केवळ पाथर्डीमध्येच नाही तर, बऱ्याच ठिकाणी, इतर राज्यांतही एसटीएमध्ये आहोत हे कळलेच नसते. आम्हाला अगोदरच माहिती होते की, आपण एसटीमध्ये आहोत. कारण, परळी हे तेलंगणाच्या सीमेजवळ येते. लोकनेते गोपीनाथ मुंडे होते तेव्हापासून सर्वांना माहिती आहे की, आपले अनेक पाहुणे तिकडे एसटीमध्ये आहेत आणि आपण इकडे व्हीजेएनटीमध्ये आहोत.
पण आता हैदराबाद गॅझेटियरनुसार इतर कुणाला फायदा मिळत असेल, तर आम्हालाही एसटीचा फायदा मिळाला पाहिजे. गॅझेटियरमधील एकेका शब्दाचा कुणाला फायदा होत असेल, तर तो आम्हाला देखील झाला पाहिजे. कारण, आपले 2 टक्क्यांमध्ये बरे चालले होते. पण आता काहीजण हे दोन टक्के काढण्याची भाषा करत आहेत. जे लोक अशी भाषा करत आहेत, त्यांना सांगतो आम्ही तुम्हाला टक्क्यातही ठेवणार नाही. आता आम्हाला अनुसूचित जमातीमध्येच आरक्षण हवे आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.
सरकार वंजारी समाजाच्या पाठिशी
धनंजय मुंडे यांनी यावेळी सरकार आपल्या पाठिशी असल्याची ग्वाही देत उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. सरकार आपल्यासोबत आहे. ते आपले काहीही नुकसान करणार नाही. सरकारवर विश्वास ठेवा. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही पाथर्डीत येऊन तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे त्यांचा व सरकारचा मान ठेवून आपले उपोषण स्थगित करा, असे ते म्हणाले. दरम्यान, उल्लेखनीय बाब म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी वंजारी समाजाचे 2 टक्के आरक्षण काढून घेण्याची मागणी केली होती.
Dhananjay Munde’s Fiery Warning to Manoj Jarange: ‘Will Not Let You Remain in a Percentage If You Touch Our 2% Quota’; Reasserts Vanjari as ST
महत्वाच्या बातम्या
- प्रत्येक 30 मिनिटांनी पश्चिम बंगालमध्ये एका महिलेवर अत्याचार, महिलांविरोधातील भीषण वास्तव एनसीआरबी अहवालाने उघड
- Haryana : हरियाणा IPS आत्महत्या, सहाव्या दिवशीही शवविच्छेदन नाही; SIT सदस्य रोहतकमध्ये दाखल
- Chandrashekhar Azad : चंद्रशेखर म्हणाले- असे वाटते की मायावती घाबरल्या आहेत, त्यांना धमकावले जात आहे, काहीतरी गुपित आहे
- बिहारमध्ये निवडणूक रणनीतीकाराची स्वतःचीच परीक्षा; पहिला प्रश्न तरी इतरांच्या आधी सोडविला!!