• Download App
    महाराष्ट्रात साथीच्या आजारांनी काढले पुन्हा डोके वर, डेंगी, काविळीने लोक बेजार |Dengue increasing very fastly in Maharashtra

    महाराष्ट्रात साथीच्या आजारांनी काढले पुन्हा डोके वर, डेंगी, काविळीने लोक बेजार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार असतानाच राज्यात डेंगी आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यात गेल्या नऊ महिन्यात डेंगीचे ५,९४४ रुग्ण आढळले असून तब्बल ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.Dengue increasing very fastly in Maharashtra

    राज्यात गेल्या वर्षी डेंगीचे एकूण ३,३५६ रुग्ण आढळले होते; मात्र या वर्षीच्या आकडेवारीवरून राज्यातील साथरोग परिस्थिती चिघळत असल्याचे दिसत आहे. डेंगीमुळे नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक सहा मृत्यू झाले आहेत; तर वर्धा, चंद्रपूर, ठाणे, भंडारा, अहमदनगर येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला.



    गेल्या वर्षी डेंगीमुळे १० रुग्णांचा मृत्यू झाला होता. डेंगीसोबतच चिकनगुनियाचा आजारही फैलावत आहे. सध्या राज्यात चिकनगुनियाचे १,४४२ रुग्ण आहेत. गेल्या वर्षी फक्त ७८२ रुग्णांची नोंद झाली होती.

    कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, काविळसारखे दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाणही राज्यात वाढले आहे. या आजारांचे आतापर्यंत १,२१७ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी १,१७४ रुग्णांना बाधा झाली होती. २०१८ मध्ये २२८९; तर २०१९ मध्ये १,५१० रुग्णांची नोंद झाली होती.

    Dengue increasing very fastly in Maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    पुणे, सांगली, ठाणे, नागपूर आणि नाशिक या जिल्हा परिषदांना ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उत्कृष्ट कामगिरीचे पुरस्कार जाहीर

    धर्माच्या आचरणातूनच मानवजातीचे कल्याण; णमोकार तीर्थक्षेत्री पंचकल्याणक प्रतिष्ठा सोहळ्यात सरसंघचालकांचे प्रतिपादन

    जलसंपदा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्ड कडून 15000 कोटींच्या कर्जासह फडणवीस सरकारचे अनेक महत्त्वाचे निर्णय