प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत उरलेल्या विरोधी पक्षांमध्ये शिवसेनेचा ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदनिष्ठ गट यांच्या संख्याबळाच्या तुलनेत काँग्रेसच्या आमदारांची संख्याबळ जास्त असल्याने काँग्रेसचाच विरोधी पक्ष नेता होईल अशी कबुली शरदनिष्ठ गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.Congress will be the leader of the opposition; Confession of Jayant Patil
आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस मधले आमदार शरदनिष्ठ गटाकडे की अजितनिष्ठ गटाकडे या वादात नेमकी संख्या कोणाकडे अधिक?, याचा निर्णय होत नव्हता. तसा निर्णय अद्यापही झालेला नाही. पण जयंत पाटलांच्या कबुलीतून अजितनिष्ठ गटाकडेच राष्ट्रवादीचे जास्त आमदार असल्याचे दिसून येते. त्यामुळेच विधानसभेतले विरोधी पक्षनेतेपद स्वाभाविकपणे संख्याबळाच्या आधारे काँग्रेसकडे जाण्याची कबुली जयंत पाटलांनी दिली.
अजित दादांबरोबर शिंदे फडणवीस सरकार मध्ये जाऊन जी मंत्री झाले आहेत, ते आमदार विरोधी बाकांवर असताना शिंदे – फडणवीस सरकारलाच सर्वाधिक प्रश्न विचारात होते. आता ते त्यांच्या बाजूने गेल्याने तेच त्यांनी आधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतील, असा टोला जयंत पाटील यांनी हाणला.
अजितनिष्ठ गटाचे आमदार लवकरच राजकीय वस्तुस्थिती समजतील. त्यांना शिंदे – फडणवीस सरकार काही देऊ शकणार नाही हे समजल्यानंतर ते पुन्हा एकदा शरद पवारांकडे वापस येतील, असा दावा रोहित पवारांनी केला होता. पण या दाव्याला देखील जयंत पाटलांच्या वक्तव्यातून छेद मिळाला आहे.
Congress will be the leader of the opposition; Confession of Jayant Patil
महत्वाच्या बातम्या
- ऑनलाईन गेमिंग, हॉर्स रेसिंगवर 28% टॅक्स, सिनेमागृहात खाद्यपदार्थ स्वस्त होणार, GST कौन्सिलच्या बैठकीत निर्णय
- 5 राज्यांत मुसळधार पावसाचा कहर, 72 तासांत 76 मृत्यू; उत्तराखंडमध्ये मुसळधारेचा इशारा, अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू
- कर्नाटक विधानसभेत नमाजासाठी स्वतंत्र खोलीची मागणी, जेडीएस आमदाराचा दावा- भाजपलाही आक्षेप नाही
- ED डायरेक्टरचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढवणे बेकायदा, सुप्रीम कोर्टाचे नव्या नियुक्तीचे आदेश