• Download App
    थोरात Vs पटोले वादावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पाठवला केरळी दूत : तोडग्यासाठी चेन्निथला यांची नियुक्ती|Congress leaders send Kerala envoy on Thorat Vs Patole dispute: Chennithala appointed for settlement

    थोरात Vs पटोले वादावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पाठवला केरळी दूत : तोडग्यासाठी चेन्निथला यांची नियुक्ती

    प्रतिनिधी

    मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र असले तरी वाद अद्याप मिटलेला नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी, एबी फॉर्मचा घोळ आणि थोरातांनी दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर पक्षातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांची नियुक्ती केली आहे. त्यांना तत्काळ अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.Congress leaders send Kerala envoy on Thorat Vs Patole dispute: Chennithala appointed for settlement

    थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात थेट दिल्लीला पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवून त्यांच्यासोबत काम करणे शक्य नसल्याची तक्रार केली होती. तसेच विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्र काँग्रेसमधील खदखद समोर आली होती.



    हा वाद लक्षात घेता पक्षश्रेष्ठींकडून महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांना तातडीने मुंबईत पाठवण्यात आले. मुंबई भेटीत वादावर तोडगा न निघाल्याने थोरात यांना पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेण्याचा सल्ला देण्यात आला.

    दुसरीकडे बुधवारी मुंबईत झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी शेजारी-शेजारी बसून दिलजमाई झाल्याचा दावा केला होता. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांनी रमेश चेन्निथला यांची नियुक्ती केली असून तत्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे, असे के.सी. वेणुगोपाल यांनी म्हटले.

    Congress leaders send Kerala envoy on Thorat Vs Patole dispute: Chennithala appointed for settlement

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस