• Download App
    Congress तरुणांचे केले "कोळसे", ज्येष्ठांना आणले "बाळसे" म्हणून काँग्रेसला सतत पराभवाचे तोंड दिसे!!

    Congress अखेर 100 + : 87 उमेदवार जाहीर, उरलेले 14 सायंकाळपर्यंत जाहीर; ठाकरे + पवार शरणागत!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 85 च्या खोड्यात अडकवण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला. पण दोन दिवस त्या बातम्या चालल्यानंतर देखील तो यशस्वी होऊ शकला नाही. काँग्रेसने अखेर 100 गाठलीच. काँग्रेसने 87 जागा वरचे उमेदवार जाहीर केले आहेत. उरलेले 14 उमेदवार संध्याकाळपर्यंत जाहीर करू, असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. वडेट्टीवार यांच्या वक्तव्याला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी देखील दुजोरा दिला.

    विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जिथे जो पक्ष जिंकू शकेल, तिथे त्या पक्षाचे उमेदवार उभे राहतील. असे उमेदवार देऊन जर काँग्रेस 100 जागा लढवत असेल, तर आम्हाला त्रास होण्याचे काही नाही, असे राऊत म्हणाले. या एका वक्तव्यातून संजय राऊत यांनी स्वतःच्या शिवसेनेची आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची काँग्रेसची पुढे शरणागती पत्करली.


    Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ पाच बचत योजनांवर FD पेक्षा जास्त मिळत आहे व्याज!


    महाविकास आघाडीतला जागावाटपाचा तिढा खूपच खेचला गेल्यानंतर शरद पवारांनी काँग्रेस आणि ठाकरे यांच्या शिवसेनेला 85 च्या खोड्यात अडकवले. संजय राऊत, जयंत पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात ज्यावेळी त्यांना सिल्वर ओक वर भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांनी प्रत्येकी 85 जागा लढवण्याचे निश्चित झाले आहे, असे तुम्ही जाहीर करा उरलेल्या जागा जागांवर मित्र पक्षांची चर्चा सुरू आहे असे सांगा असे पवारांनी अशी सूचना पवारांनी या सगळ्या नेत्यांना केली होती. त्यानुसार त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकी 85 जागा लढवण्याचा फॉर्म्युला जाहीर केला, पण संजय राऊत यांनी बेरीज चुकली. 255 ची बेरीज 270 सांगितली. पवारांच्या खोड्यात काँग्रेस अडकली.

    पण काँग्रेसच्या चलाख नेत्यांनी पवारांची “गेम” ओळखली. त्यांनी त्या रात्रीच पवारांचा तो 85 चा खोडा उधळून लावायचा निश्चय केला. दिल्लीत राहुल गांधींनी जागावाटपात पर्सनली लक्षात घातले. प्रत्येक जागेविषयी त्यांनी खल केला. राहुल गांधी महाराष्ट्रातल्या प्रदेश नेत्यांवर नाराज असल्याच्या बातम्या पसरल्या पण काही झाले तरी राहुल गांधींनी पर्सनली लक्ष घातल्यानंतर काँग्रेसने महाविकास आघाडीत शंभरी गाठलीच. काँग्रेस 101 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    Congress destroys pawar plans, to cross 100 mark in maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!