• Download App
    CM Devendra Fadnavis धमक्या देणाऱ्यांना सोडणार नाही, कोणाचेही घर उडवू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा

    CM Devendra Fadnavis : धमक्या देणाऱ्यांना सोडणार नाही, कोणाचेही घर उडवू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा

    CM Devendra Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :CM Devendra Fadnavis   शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धमक्यांच्या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे. कोणालाही धमकावणे किंवा कोणाचेही घर उडवण्यासारख्या धमक्या देणे सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी पोलिसांना कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश असल्याचे सांगितले.CM Devendra Fadnavis

    ‘कोणालाही घाबरण्याचे कारण नाही’

    नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही कोणाचेही घर उडवू देणार नाही किंवा कोणालाही कोणत्याही प्रकारे धमकावू देणार नाही. अशा धमक्यांमुळे कुणीही घाबरू नये. जर कोणी धमक्या देत असेल तर पोलिस त्यांच्यावर कायद्यानुसार योग्य आणि कठोर कारवाई करतील.”CM Devendra Fadnavis



    धमकीच्या वक्तव्यांवरून राजकारण तापले

    अलीकडेच खासदार संजय दिना पाटील यांच्या काही वक्तव्यांवरून राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत सरकार कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

    कायद्यापुढे सर्व समान

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचेही नाव न घेता, धमक्या देणारे कोणत्याही पक्षाचे असोत, कायद्यापुढे सर्व समान आहेत, असा संदेश दिला. राज्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात पोलिस प्रशासन कठोर पावले उचलेल, असेही त्यांनी नमूद केले.

    नागपूर विमानतळाचा विकास वेगाने; कार्गो हबच्या स्वप्नाला मिळणार बळ– फडणवीस

    नागपूर विमानतळाच्या संचालनाची जबाबदारी आज जीएमआरकडे (GMR) सोपवण्यात येत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. यामुळे नागपूरमध्ये अत्याधुनिक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज विमानतळ उभारला जाणार असून, मध्य भारतासाठी एक सक्षम हवाई वाहतूक परिसंस्था निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच नागपूरला कार्गो हब म्हणून विकसित करण्याचे स्वप्नही यामुळे पूर्णत्वास जाईल. विमानतळ विकासामुळे उद्योग, व्यापार, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळून विदर्भासह संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

    Won’t Allow Anyone’s House to Be Blown Up”: CM Devendra Fadnavis Issues Warning

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rohit Pawar’ : रोहित पवारांचा दावा- फुटलेल्या खासदारांना 80-90 कोटी कॅश आणि 250 कोटींचा निधी; ओमराजेंनाही लगावला टोला

    नागपूर मेट्रो टप्पा – 2 चा विस्तार आणि मुंबईच्या सावरकर सागरी सेतू – वांद्रे किल्ला कनेक्टरला फडणवीस सरकारची मान्यता!!

    Narayan Rane : खासदार झाले, आता पुढचा नंबर आमदारांचा; भाजप नेते नारायण राणेंचे मोठे विधान; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत काय म्हणाले राणे?