• Download App
    नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संयम बाळगावा ; गृहमंत्र्यांचे कळकळीचे आवाहन । Citizens should not believe any rumors, should exercise restraint; Home Minister's heartfelt appeal

    नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संयम बाळगावा ; गृहमंत्र्यांचे कळकळीचे आवाहन

    • त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. Citizens should not believe any rumors, should exercise restraint; Home Minister’s heartfelt appeal

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांचे पडसाद राज्यात उमटले. दरम्यान राज्यात ठिकठिकाणी निषेधार्थ मोर्चे काढण्यात आले होते. “कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका,अफवा पसरवूही नका.राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, राज्याच्या जनतेनं शांतता व संयम राखावा,” असं आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे

    त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, तसेच पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळण्याचे आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील यादृष्टीने कार्यरत राहण्याच्या सूचनाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.

    या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.तसेच या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही वळसे पाटील यांनी जनतेला केली आहे.

    Citizens should not believe any rumors, should exercise restraint; Home Minister’s heartfelt appeal

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Eknath Shinde : ‘इंडिया आघाडी मोदीद्वेषातून जन्माला आली’; दिल्लीतून एकनाथ शिंदेंचा घणाघात, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी वाढवली उत्सुकता

    Maharashtra; Govt : अवकाळी पावसाचा मोठा फटका; राज्यातील 56 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, सरकारकडून मदतीची तयारी

    जागतिक व्यासपीठावर भारताच्या योगसामर्थ्याचा दिमाखदार विजय; तब्बल १०२ सुवर्ण, ९ रौप्य आणि ३ कांस्य पदकांची कमाई!!