अहमदनगर जिल्ह्यात फक्त १ डोस घेतला पण लस असूनही ५ लाख लोक आहेत ज्यांनी दुसरा डोस घेतला नाही.Citizens beware! If the corona is not vaccinated, there is no ration water; Guardian Minister Hassan Mushrif’s announcement
विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जगभरात ‘ओमिक्रॉन’चा धोका पसरू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात लस न घेणाऱ्या ९ लाखांहून अधिक लोकांच्या सर्व सुविधा बंद करण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.अहमदनगर जिल्ह्यात फक्त १ डोस घेतला पण लस असूनही ५ लाख लोक आहेत ज्यांनी दुसरा डोस घेतला नाही.
या लोकांना शोधून त्यांच्या गावात पोस्टर लावले जातील आणि त्यांच्या सर्व सुविधा बंद केल्या जातील, आता लस उपलब्ध असूनही लोक लस देत नाहीत, यामुळे सर्व सुविधा बंद केल्या पाहिजेत असे वक्तव्य ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत एकूण १५६ आंतरराष्ट्रीय प्रवासी जिल्ह्यात दाखल झाले असल्याची माहिती आहे. यामध्ये तब्बल ८६ प्रवासी ओमिक्रोनचा उगम झालेल्या देशातून आले असल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे.
Citizens beware! If the corona is not vaccinated, there is no ration water; Guardian Minister Hassan Mushrif’s announcement
महत्त्वाच्या बातम्या
- गुलाबरावांची मंत्रिपदावरून हकालपट्टी कधी होणार? ; चित्रा वाघ यांनी उपस्थित केला सवाल
- पुण्याच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध; अमित शाह यांचे पुणेकरांना महापालिकेतील कार्यक्रमात वचन
- नगरकरांनो सावधान ! कोरोना लस घेतली नाही तर रेशनपाणी नाही ; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा
- उद्यापासून औरंगाबादच्या शाळेची घंटा वाजणार !