विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raut शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या विधानाची सध्या चर्चा सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील पुढच्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतील, असा दावा राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या विधानावर आता आमदार चंद्रकांत पाटील यांनी खळबळजनक भाष्य केले आहे. संजय राऊत भविष्यात ठाकरे गट फोडणार असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.Raut
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले, शिवसेना पक्षाचे जे तुकडे झाले आहेत, ते संजय राऊत यांच्यामुळे झाले आहेत. एकसंघ शिवसेनेचे तुकडे करण्यास संजय राऊत हेच कारणीभूत आहेत, संजय राऊत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. संजय राऊत जळगावमध्ये लग्नाला येतात आणि राजकीय गप्पा मारतात. आम्ही शिवसेनेत किती निष्ठावंत आहोत हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, अशी टीका पाटील यांनी केली आहे.Raut
तसेच एकनाथ शिंदे यांना सोडण्याचा कोणताही विचार मी करू शकत नाही, असे स्पष्टीकरणही यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. पुढे ते म्हणाले, जेव्हा आम्ही असे कुठलेही काम करू तेव्हा थेट घरी बसू. संजय राऊत शिवसेनेचा ठाकरे गट फोडून एक नवा गट स्थापन करून उरलेली शिवसेना फोडण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे गटात राऊत हे मोठी उठाव करणार आहेत. ते नवीन गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत, असा खळबळजनक दावाही पाटलांनी केला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले होते की, आमदार चंद्रकांत पाटील आणि पाचोरा पारोळाचे आमदार पुढची निवडणूक भाजपकडून लढतील. हे दोन्ही आमदार गिरीश महाजन यांच्या अतिशय निकटवर्तीय असल्याचे मानले जातात. त्यामुळे ही माझी खात्रीची माहिती आहे, असा दावा राऊत यांनी केला होता.
“Raut Will Split UBT Faction”: MLA Chandrakant Patil’s Counterattack
महत्वाच्या बातम्या
- शिवछत्रपतींनी उभारलेले किल्ले संस्कृतीचे चैतन्यमय तीर्थाटन; खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदींचे प्रतिपादन
- Raghav Chadha : आप ने राघव-चड्ढा यांना राज्यसभेतून उपनेता पदावरून हटवले; चार वर्षांपासून खासदार
- Amit Shah : शहा म्हणाले- 15 दिवस बंगालमध्ये राहणार; ममतांना त्यांच्याच घरात हरवायचे आहे, TMCला खाडीत फेका
- विधानसभेच्या पोटनिवडणुकीत बारामती मध्ये काँग्रेसला राजकीय पुनरुज्जीवनाची संधी!!