प्रतिनिधी
मुंबई – भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या केंद्रीय मंत्रिपदाची महाराष्ट्रातल्या माध्यमांमध्ये खूप चर्चा झाली. परंतु, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे दुखावल्या गेलेल्या भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांच्या दुखऱ्या मनावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी फुंकर घातली आहे. BJP state president chandrakantdada patil luads BJP national secretary pankaja munde for her sustained behaviour
काल पंकजा मुंडे यांनी मुंबईत आपल्या समर्थकांच्या मेळाव्यात महाभारत युध्दाचा उल्लेख करून ते आपण टाळत असल्याचे सांगितले होते. त्यावर चंद्रकांतदादांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ते म्हणाले की एखाद्याला न्याय मिळाला, तर दुसऱ्यावर अन्याय होतोच. सर्वांना एकाच वेळी न्याय मिळू शकत नाही. डॉ. भागवत कराडांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपद मिळाले. प्रीतम मुंडे यांना मिळाले नाही. कार्यकर्त्यांची इच्छा होती. पण तसे घडले नाही.
नारायण राणेंना मंत्रिपद मिळाले, रणजित निंबाळकरांना मिळाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १२ जणांचे राजीनामे घेतले. ४० जणांना नव्याने निवडायचे होते. त्यामुळे असे घडले. त्यावर कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. पण यातून सावरणे हा समंजसपणा आहे. पंकजाताईंना तो काल दाखवला आहे. परिपक्वता दाखवून त्यांनी सर्वांना सांभाळून घेतले आहे, अशा शब्दांत प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांचे कौतुक केले.
ते म्हणाले, की भाजप वाढवण्यात अनेकांचे योगदान आहे. मात्र, गोपीनाथ मुंडेंनी कार्यालयातील संघटना रस्त्यावर आणली. संघटनेला संघर्ष करायला शिकवले. त्यामुळे त्यांचे योगदान वेगळे आहे. अशा घरात जन्मलेल्या पंकजाताई कधीच बंडाचा विचार करणार नाहीत. एखादी गोष्ट आवडली नाही तर कार्यकर्त्यांना भावना व्यक्त करण्याचा आधिकार आहे, अशी पुस्तीही चंद्रकांतदादांनी जोडली.
BJP state president chandrakantdada patil luads BJP national secretary pankaja munde for her sustained behaviour
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचे गिफ्ट, DA 11% वाढून 28% केला, जाणून घ्या सॅलरी आणि पेन्शनमध्ये किती होणार वाढ
- फादर स्टॅन स्वामींना पद्म पुरस्कार देण्यात यावा, काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांचे ट्वीट
- Patanjali Research Trust : बाबा रामदेवांच्या पतंजली रिसर्च फाउंडेशनला दान दिल्यास टॅक्समध्ये मिळेल पाच वर्षांसाठी सूट
- गोव्यातही 300 युनिट मोफत वीज देणार केजरीवाल, सत्ता आल्यास जुने वीजबिल माफ करण्याचे आश्वासन
- Maha Electric Vehicle Policy : महाराष्ट्रात विद्युत वाहन धोरण जाहीर, काय आहेत तरतुदी, वाचा सविस्तर