• Download App
    Aam Aadmi Party दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप' आणि काँग्रेस

    Aam Aadmi Party : ‘ छोटे मियाँ आणि बडे मियाँ यांच्यातील लढाई झाली सुरू’; भाजपचा काँग्रेस अन् ‘आप’ला टोला!

    दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ आणि काँग्रेस आमनेसामने, भाजपच्या शहजाद पूनावालांनी दिली प्रतिक्रिया


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :Aam Aadmi Party  दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर होतील. अशा परिस्थितीत भाजप, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस आमनेसामने आले आहेत. लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हातात हात घालून चालत होते.Aam Aadmi Party



     

    तर, दिल्ली विधानसभा निवडणुकीत नेमके उलटे चित्र दिसून येत आहे. खरंतर, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस दिल्लीत वेगवेगळे निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्याबाबत बोलले आहे. यामुळे राजकारण आणखी तापले आहे.

    आता दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस आमनेसामने आले आहेत. अशा परिस्थितीत, अरविंद केजरीवाल असोत किंवा राहुल गांधी, दोघेही एकमेकांवर जोरदार निशाणा साधत आहेत. अशा परिस्थितीत भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी एक विधान केले आहे. शहजाद पूनावाला म्हणाले, “छोटे मियाँ आणि बडे मियाँ यांच्यातील लढाई काल सुरू झाली.

    काही महिन्यांपूर्वी आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हम साथ साथ हैं गात होते आणि आता ते हम आपके हैं कौन गात आहेत. जर काँग्रेसची लढाई फक्त काँग्रेसला वाचवण्यासाठी होती, तर अरविंद केजरीवाल, तुम्ही लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासोबत का गेलात, तुम्हालाही काँग्रेसला वाचवायचे होते का? आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्ष व्होट बँकेचे राजकारण करण्यात सारखेच आहेत.

    BJP criticizes Congress and Aam Aadmi Party after they face off in Delhi Assembly elections

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये संभाव्य एन्ट्री, पुढच्या राजकारणातला धोका ओळखून आमदार सीमा हिरे यांचा विरोध; पण निर्णय काय होणार??

    Girish Mahajan : तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले विचारले तर काय होईल? गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर पलटवार

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!