• Download App
    राज्यात यात्रा, जत्रा आणि तमाशासह सांस्कृतिक कार्यक्रमांना तूर्त बंदीच; हळूहळू परवानगी देणार Ban on cultural programs including yatras, fairs and tamasha in the state continue ; Will allow slowly : Cultural Affairs Minister Amit Dekhmukh

    राज्यात यात्रा, जत्रा आणि तमाशासह सांस्कृतिक कार्यक्रमांना तूर्त बंदीच; हळूहळू परवानगी देणार

    वृत्तसंस्था

    मुंबई : “राज्यात कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतरच यात्रा, जत्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाईल”, असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देखमुख यांनी स्पष्ट केलं आहे. Ban on cultural programs including yatras, fairs and tamasha in the state continue ; Will allow slowly : Cultural Affairs Minister Amit Dekhmukh

    अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर आणि शिष्टमंडळाने या संदर्भात देशमुख यांची भेट घेतली तेव्हा ते बोलत होते.

    कोरोनाची दुसरी लाट ओसरली असा समज असताना पुन्हा कोरोनाचा फैलाव होत आहे. राज्यात रुग्णसंख्या घटल्यानंतर काही निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली होती. मात्र, सरकार सावध पावले टाकत आहे. जिल्ह्यातील परिस्थितीनुसार नियमांमध्ये बदल केले जात आहेत.



    अजूनही काही जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू आहेत. अशातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या इशाऱ्यानंतर करोनाबाबत उपाययोजना आखल्या जात आहेत. आता सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी यात्रा आणि जत्रांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

    गेल्या दीड वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी आहे. तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगून हळूहळू यात्रा आणि जत्रा यांना परवानगी देणार असल्याचे अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे रघुवीर खेडकर आणि शिष्टमंडळाला सांगितले.
    – अमित देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री, महाराष्ट्र

    Ban on cultural programs including yatras, fairs and tamasha in the state continue ; Will allow slowly : Cultural Affairs Minister Amit Dekhmukh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nana Patole : सुप्रीम कोर्टात प्रकरण जाताच EVM मशिन्स जाळल्या:’ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी’प्रमाणे मोदी सरकारचा कारभार- नाना पटोले

    Rohit Pawar : रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन मागे:गिरीश महाजनांची शिष्टाई यशस्वी; अधिवेशनाच्या आधी चर्चेचे सरकारचे आश्वासन

    CM Devendra Fadnavis : ‘पांढऱ्या पट्ट्यांवरून’ राजकारण करणाऱ्यांना मते मिळत नाहीत:मुख्यमंत्री फडणवीसांचा मनसेला टोला; गिरगावात कार्यकर्त्यांची धरपकड