शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे खोटे बोलणाऱ्याना थारा नव्हता.आपणही गुप्तचर लावून आपले लोकप्रतिनिधी काय करतात याची माहिती घ्यावी असा सल्ला केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिला. Balasaheb Thakare never supported liars, find out what the your people’s representatives are doing by spying, Narayan Rane advises Uddhav Thakare
विशेष प्रतिनिधी
कणकवली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे खोटे बोलणाऱ्याना थारा नव्हता.आपणही गुप्तचर लावून आपले लोकप्रतिनिधी काय करतात याची माहिती घ्यावी असा सल्ला केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिला.
चिपी विमानतळ उद्घाटन प्रसंगी राणे बोलत होते. विमानतळाला विरोध कसा झाला हे सांगताना राणे म्हणाले, विमानतळाचे काम सुरू झाले तेंव्हा काही जण आंदोलन करत होते. रेड्डी बंदराला ही विरोध करतात. हायवेचे कामही अडवण्यात आले. त्यामागे कोण आहेत, कोण आडवत होते त्याची माहिती घ्या. सी वीड तोंडवलीला कोण आंदोलन करत होतं. हा प्रकल्प कोणी अडवला याचीही माहिती घ्या.
राणे म्हणाले, चिपी विमानतळ सुरू होत आहे हा जीवनातला आनंदाचा क्षण आहे. यावेळी राजकारण करू नये असं वाटत होते. मात्र विमानतळ काम सुरू झाले तेंव्हा काही जण आंदोलन करत होते. त्याचे फोटोही आहेत. राणे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी १९९० साली सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाठवले. ९० साली निवडून आलो.
तेव्हा जिल्ह्यात प्यायला पाणी नव्हतं, रस्ते नव्हते, वीज नव्हती, शाळा नव्हत्या नोकरीसाठी लोक मुंबई गाठायचे. मुंबईवर अवलंबून असलेल्या हा जिल्हा होता. बाळसाहेबांमुळे मी या जिल्ह्याचा विकास करू शकलो. मुख्यमंत्री झाल्यानंतर १२० कोटी सिंधुदूर्गला दिले. पाण्यासाठी ११८ कोटी दिले.आत्ताचं इन्फ्रास्चक्चर आहे ते नारायण राणे मुळे आहे. त्याच्या जवळपास पण कोणी नाही. शिक्षणात आग्रेसर जिल्हा झाला. तो कोणामुळे ते सर्वांना माहित आहे.
Balasaheb Thakare never supported liars, find out what the your people’s representatives are doing by spying, Narayan Rane advises Uddhav Thakare
महत्त्वाच्या बातम्या
- माझ्या कोकणवासीयांना साद, हातात हात गुंफून विकासाच्या यात्रेत सहभागी होऊयात! – नारायण राणे
- वसुली म्हटल्यावर सरकारचा ‘ससा’, शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’; मदत तर त्याहून संतापजनक, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- भाजप विरोधात भाषणे करून ममता बॅनर्जी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसताहेत; अधीर रंजन चौधरी यांचे अचूक शरसंधान!!
- दुर्गा सन्मान : महिला आणि मुलींच्या संरक्षण – सक्षमीकरणात कायमच आघाडीवर!!, वैशाली केनेकर
- लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपींना अटक का करत नाही?, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल