Thursday, 1 May 2025
  • Download App
    शरद पवार सुधारत नसल्यानेच महाविकास आघाडीतून बाहेर, राजू शेट्टी यांनी सांगतिले कारण|As Sharad Pawar is not improving, we out of the Mahavikas Aaghadi, said Raju Shetty

    शरद पवार सुधारत नसल्यानेच महाविकास आघाडीतून बाहेर, राजू शेट्टी यांनी सांगतिले कारण

    विशेष प्रतिनिधी

    कऱ्हाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. किमान समान कार्यक्रमावर विश्वास ठेवून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. मात्र, एकत्र येऊनही हे लोक सुधारत नाहीत म्हणून त्यातून बाहेर पडलो आहे. शरद पवार तर ऊस उत्पादकांना डोळ्यासमोर न ठेवता त्यावर प्रक्रिया करणाºया लोकांना डोळ्यासमोर ठेवून राजकारण करतात, अशी टीका शेट्टी यांनी केली आहे.As Sharad Pawar is not improving, we out of the Mahavikas Aaghadi, said Raju Shetty

    पत्रकार परिषदेत बोलताना शेट्टी म्हणाले, शेतकºयांचे प्रश्न राजकारणापलीकडे जाऊन ऐरणीवर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच प्रत्येक गावांमधील ग्रामसभेत शेतीला दिवसा दहा तास वीजपुरवठा मिळाला पाहिजे. शेतमालाला हमीभाव केंद्राने मंजूर करावा, अशा आशयाचे दोन ठराव करून घेत आहोत.



    निसगार्तील सहा घटकांपासून वीज तयार होते. मात्र, विजेचे वाटप करताना शेतकऱ्यांना आठ तास आणि इतरांना चोवीस तास हे गणित चुकीचे आहे. शेतकºयांशी सरकार क्रूरतेने वागत आहे. म्हणूनच याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे.

    एकरकमी एफआरपीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे. सुरू होणाºया गळीत हंगामामध्ये एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय राज्यातील सहकारी साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. त्यासाठी टोकाचा संघर्ष करणार आहे.

    राज्यात ६५ ते ७० लाख टन ऊस गळिताशिवाय शिल्लक आहे. तो अचानक उभा राहिलेला नाही. उसाचे नोंदलेले क्षेत्र, उपलब्ध असणारी गाळप क्षमता ही सरकारला माहीत होती. त्यांनी त्याबाबत नियोजन करणे गरजेचे होते. योग्य नियोजनाच्या अभावामुळेच हा प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोपही शेट्टी यांनी केला.

    As Sharad Pawar is not improving, we out of the Mahavikas Aaghadi, said Raju Shetty

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    फडणवीस सरकारने स्वतःच घेतलेल्या परीक्षेत सरकार 78 % गुण मिळवून पास; पण काही विभागांमध्ये नापास!!

    Chief Minister Fadnavis : जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाने सामाजिक न्यायाचे पर्व सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही केले निर्णयाचे स्वागत

    Sarsanghchalak : सरसंघचालकांच्या हस्ते काशीमध्ये मजुराच्या मुलीचे कन्यादान; वराला म्हणाले- माझ्या मुलीची काळजी घ्या!