• Download App
    शिवाजी महाराजांबद्दल जेवढं तुम्हीही वाचलं नसेल, तेवढं मी ५० वर्षांपूर्वी वाचलं आहे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी|As much as you may not have read about Shivaji Maharaj, I have read 50 years ago: Governor Bhagat Singh Koshyari

    शिवाजी महाराजांबद्दल जेवढं तुम्हीही वाचलं नसेल, तेवढं मी ५० वर्षांपूर्वी वाचलं आहे ; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    वृत्तसंस्था

    सिंहगड : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढं तुम्हीही वाचलं नसेल, तेवढं मी ५० वर्षांपूर्वी वाचलं आहे, असे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.As much as you may not have read about Shivaji Maharaj, I have read 50 years ago: Governor Bhagat Singh Koshyari

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सिंहगडाला भेट दिली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे यांच्याविषयी आदर व्यक्त केला.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी पुण्यातील सिंहगडाला भेट दिली. सिंहगडावर स्वागत झाल्यानंतर आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “शिवाजी महाराज हे आपल्या देशाचा अभिमान आहेत, स्वाभिमान आहेत.”



    शिवाजी महाराज भारताचेच नाही, जगाचे हिरो!

    “भारतात छत्रपती शिवाजी महाराज एका नव्या अवताराच्या रुपात आले. मोघल साम्राज्याचा अंत करण्यात आणि भारतात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात त्यांनी ज्या बुद्धी, युक्ती आणि शक्तीचा वापर केला आणि राज्य केलं, त्याद्वारे एक प्रकारे एक नवी चेतना देशात जागृत केली. त्यामुळे शिवाजी महाराज हे फक्त भारताचेच नाही, तर जगाचे हिरो बनले आहेत.

    जगभरातल्या इतिहासकारांनी त्यांच्या सामर्थ्याचं गुणगान केलं आहे”, असं राज्यपाल यावेळी म्हणाले.दरम्यान, यावेळी राज्यपालांनी आपण शिवाजी महाराजांबद्दल ५० वर्षांपूर्वी वाचन केल्याचं सांगितलं. “मी तानाजी मालुसरे, शिवाजी महाराज, बाजी प्रभू देशपांडे या सगळ्यांविषयी ५० वर्षांपूर्वी वाचलं आहे, जेवढं तुम्ही देखील वाचलं नसेल. कारण शिवाजी हे आपल्या देशाचा अभिमान आहेत, स्वाभिमान आहेत”

    असं ते माध्यम प्रतिनिधींना उद्देशून म्हणाले. “शिवाजी महाराज हे आपल्या देशाचे नायक आहेत. देशातील मुलांना सुरुवातीपासूनच शिवाजी महाराजांविषयी, तानाजी मालुसरेंविषयी शिकवलं जायला हवं. असं झालं, तर आपल्या देशातील मुलं देखील तानाजी मालुसरे होऊ शकतील, शिवाजी होऊ शकतील”, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

    As much as you may not have read about Shivaji Maharaj, I have read 50 years ago: Governor Bhagat Singh Koshyari

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये संभाव्य एन्ट्री, पुढच्या राजकारणातला धोका ओळखून आमदार सीमा हिरे यांचा विरोध; पण निर्णय काय होणार??

    Girish Mahajan : तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले विचारले तर काय होईल? गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर पलटवार

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!