• Download App
    अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना दिलासा|Arnab Goswami gets relif from court

    अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना दिलासा

    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई  : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग सत्र न्यायालयातील खटल्याला गैरहजर राहण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने आज दिली.Arnab Goswami gets relif from court

    तसेच, पुढील सुनावणीपर्यंत याप्रकरणी कठोर कारवाई करण्यापासूनही न्यायालयाने गोस्वामी यांना दिलासा दिला आहे.नाईक यांनी मे २०१८ मध्ये त्यांच्या आईसह आत्महत्या केली आहे.



    याप्रकरणी गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबाग सत्र न्यायालयाने या खटल्याची कारवाई सुरू केली आहे. या सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी तिघांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत केली आहे.

    तसेच पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणीही केली आहे. शुक्रवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी खंडपीठाने निश्चित केली आहे. तोपर्यंत न्यायालयाने दिलेला दिलासा कायम राहणार आहे.

    Arnab Goswami gets relif from court

    हे ही वाचा

    Related posts

    100 वर्षांत महाराष्ट्र विधानपरिषदेने नेमके केले काय??, वाचा परंपरा, चर्चा आणि निर्णयांच्या वारशाचा इतिहास!!

    बार्टी, सारथी, महाज्योती योजनांचे लाभ एकाच कुटुंबातल्या एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मिळाल्याच्या तक्रारी; अजित पवारांनी घेतली दखल

    Sudhir Mungantiwar, : मंत्री सभागृहात येत नसतील तर त्यांच्यावर बिबटे सोडा- सुधीर मुनगंटीवार संतापले, घरकूल निधीवरूनही रोष