ग्रेटर निकोबार प्रकल्पासंदर्भात लिबरल मीडियाकडून जनसामान्यांचा बुद्धिभेद; नेमके वास्तव काय??
केंद्रातल्या मोदी सरकारने अविकसित राहिलेल्या पूर्व भारताकडे विशेष लक्ष पुरवून त्या परिसरात विविध विकास कामांना प्राधान्य दिले इतकेच नाही
केंद्रातल्या मोदी सरकारने अविकसित राहिलेल्या पूर्व भारताकडे विशेष लक्ष पुरवून त्या परिसरात विविध विकास कामांना प्राधान्य दिले इतकेच नाही
केंद्रातल्या मोदी सरकारने पुढाकार घेऊन राबविलेल्या मेक इन इंडिया या उपक्रमाला महाराष्ट्रात सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय.
महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता मिळेना, पण संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बांधल्या मुख्यमंत्र्यांच्या नावांच्या माड्या!!, असेच आज घडले.
अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर रंगलेल्या राजकारणाचे वर्णन करताना काही मराठी माध्यमांनी एकनाथ शिंदे हे “अजितदादांची जागा” घेत असल्याची मखलाशी चालविली आहे, पण मूळात काँग्रेसी विचारांच्या पक्षांची political space कमी होत चालली आहे याकडे मात्र त्यांचे लक्ष नाही.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला. त्यात ते म्हणाले की, अजितदादांच्या रूपाने मी एक जवळचा मित्र गमावला. अजित पवार म्हणजे महाराष्ट्राला लाभू न शकलेले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री होते. त्यांच्यात मुख्यमंत्री होण्याची पूर्ण क्षमता होती. नियतीने कधीतरी त्यांचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण केले असते.
विमानतळ परिसरातील अहिल्यानगर रोडवरील सिटी स्पेस बिल्डिंगमधील ‘द रुट्स स्पा’ येथे स्पाच्या आडून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर विमानतळ पोलिसांनी सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांना पाहून दोघेजण दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उतरून पळण्याचा प्रयत्न करताना पडून जखमी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला तर एक पुरुष जखमी झाला आहे.
केंद्रातल्या मोदी सरकारने आणि महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने सार्वजनिक आरोग्य प्रणालीवर विशेष लक्ष केंद्रित केले असून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना यांचा विस्तार केला आहे. अनेक खर्चिक आणि दुर्मिळ आजारांवर या दोन्ही योजनांद्वारे सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार होतात.
सह्याद्रीच्या धुक्याने वेढलेल्या डोंगररांगा असोत की मेळघाटचे दुर्गम भाग, आता प्रत्येक आदिवासी पाड्यापर्यंत ‘लालपरी’ पोहोचणार आहे. ‘केवळ गाव तिथे एसटी नाही, तर आता आदिवासी पाडा तिथे एसटी’ असा ठाम निर्धार करत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी राज्याच्या विकासाचा एक नवा अध्याय सुरू केला आहे.
महाकवी भास यांच्या ‘स्वप्नवासवदत्तम्’ या नाटकात एक सुभाषित आहे. लाकूड जळते तेव्हा अग्नी फक्त शरीर जाळतो. पण मित्रशोक हा हृदय आणि अंतस्थ आत्म्यालाही जाळतो, असे त्यामध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीच उरली नाही. याचे प्रत्यंतर काल महाविकास आघाडीच्या बैठकीत आले. कारण महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांनी दांडी मारली, तरीसुद्धा महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यासाठी संजय राऊत आज उतावळे झाले.
अन्न आणि औषध प्रशासन विभागातील कर्मचारी राजू ढेरिंगे याला लाच घेताना रंगेहात पकडल्याच्या घटनेनंतर अडचणीत आलेले मंत्री नरहरी झिरवाळ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट दिली आहे. या लाचखोरी प्रकरणात संबंधित मंत्र्यांविरोधात कोणताही ठोस पुरावा समोर आला नसल्याचे स्पष्ट करत, जर पुरावे उपलब्ध असतील तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग स्वतःहून योग्य ती कारवाई करते, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा केवळ अपघात आहे की त्यामागे काही घातपात दडलाय? यावर सरकारने मौन सोडून स्पष्टीकरण द्यावे. देशात यावर चर्चा सुरू असताना सरकार केवळ दोन ओळींच्या स्पष्टीकरणात बोळवण का करत आहे?” असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वी आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती. तसेच अजित पवारांच्या विमान अपघातावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 13 निर्धारित मुद्यांवर सध्या चौकशी सुरू असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीने आज साठी मध्ये पदार्पण केले. 1967 मध्ये ते विधानसभेवर निवडून पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या संसदीय निवडणुकीत एकदाही पराभव झाला नाही. ते संसदीय परंपरेतल्या विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहांचे सदस्य राहिले. बारामती पासून ते दिल्ली पर्यंत शरद पवार हे व्यक्तिमत्व कायम माध्यमांच्या चर्चेत राहिले. पंतप्रधान पदाची स्पर्धेपासून ते राज्यसभा सदस्यत्वासाठी धडपड या सगळ्या पातळ्यांवर शरद पवारांची चर्चा झडली
नाशिक : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आज विरोधी पक्षांनी मुंबईत एकत्रित बैठक घेतली, पण महाविकास आघाडीच्या या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी दांडी मारली. […]
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्व हक्कांच्या संरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज, म्हणजेच 21 फेब्रुवारी 2026 रोजी, उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे, ज्यात म्हटले आहे की, अभिनेत्याचा प्रसिद्ध संवाद ‘खामोश’ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी विशेषतः जोडलेला आहे आणि तो त्यांच्या नाव, आवाज किंवा चित्रासोबत परवानगीशिवाय वापरला जाऊ शकत नाही.
नाशिक : एकीकडे शरद पवार आजारी असताना आणि तरीसुद्धा शरद पवार गटाने त्यांच्याच नावाचा आग्रह राज्यसभेसाठी धरला असताना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र परस्पर […]
त्याग, पराक्रम आणि सेवा समाजघडणीसाठी आवश्यक आहे. महिलांमध्ये ऋजुता असते.त्यामुळे सेवेची प्रेरणा मुळातच त्यांच्या अंगी असते.
राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील रिक्त असलेली ५०१२ सहायक प्राध्यापकांची आणि विद्यापीठांमधील ६०० अशा एकूण ५६१२ पदांची भरती प्रक्रिया येत्या जूनमध्ये नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (२१ फेब्रुवारी) येथे दिली.
संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसभेत जावे, अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र त्याच वेळी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची जागा शिवसेना ठाकरे गटालाच मिळाली पाहिजे,
मालेगाव येथील न्यायालयात शनिवारी घडलेल्या घडामोडींनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली. मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी खासदार संजय राऊत स्वतः उपस्थित राहिले. मात्र यावेळी वातावरण आधीपेक्षा वेगळे होते. न्यायालयीन प्रक्रियेनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र येत माध्यमांशी संवाद साधला आणि वादावर पडदा टाकल्याची घोषणा केली.
देशातील ३७ आणि महाराष्ट्रातील ७ राज्यसभेच्या जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) उमेदवारीवरून मोठे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. आमदार रोहित पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन एक खळबळजनक खुलासा केला. “अजितदादांना शरद पवारांनीच राज्यसभेवर जावे अशी इच्छा होती,” असे म्हणत त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांनी केलेला छगन भुजबळांच्या उमेदवारीचा दावा खोडून काढला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रीय राजधानी असणाऱ्या नवी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला पाठिंबा देणाऱ्या तेदेपाचे व्हीएसआर विमान कंपनीशी साटेलोटे असल्याचा आरोप करत केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा आतापर्यंत 3 वेळा मस्साजोगला येऊन गेल्याची धक्कादायक बाब आज समोर आली. त्यामुळे पीडित देशमुख कुटुंबीयांनी त्याच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा करत सुरक्षेची मागणी केली आहे.