• Download App
    Ambadas Danve Questions Chhagan Bhujbal's Cabinet Position After Attack on Vikhe Patil; Hints at Possible Bail Cancellation भुजबळांचा जामीन रद्द होऊ शकतो; ठाकरे गटाने व्यक्त केला संशय;

    Chhagan Bhujbal : भुजबळांचा जामीन रद्द होऊ शकतो; ठाकरे गटाने व्यक्त केला संशय; मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य नसेल तर राजीनामा देण्याचा सल्ला

    Chhagan Bhujbal

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : Chhagan Bhujbal बीडमध्ये ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा आक्रमकपणे पार पडल्यानंतर, आता या मेळाव्यातील वक्तव्यांनी राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर सभेत महायुतीतील सहकारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर थेट टीका केल्यामुळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भुजबळ यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत हल्लाबोल केला आहे. दानवे यांनी भुजबळ यांना थेट राजीनामा देण्याचा सल्ला देत, त्यांच्या जामिनाबाबतही सूचक विधान केले आहे.Chhagan Bhujbal

    भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या धोरणाला विरोध करत विखे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला दानवे यांनी ‘दुटप्पीपणा’ ठरवले आहे. दानवे यांनी थेट प्रश्न केला की, तुमचा जर मंत्रिमंडळाच्या निर्णयाला विरोध असेल, तर मग भुजबळ यांनी मंत्रिमंडळात का रहावे? मंत्र्यांचा राग आहे, तर मंत्रिमंडळात का राहावे? मंत्रिमंडळात राहून मंत्र्यांच्या निर्णयाला विरोध करणे, हा राजकीय दुटप्पीपणा आहे आणि यातून नेतृत्व करणाऱ्या लोकांचा एक राजकीय बुरखा समोर आला आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे.Chhagan Bhujbal



    राज्य सरकार तर ‘खेळ’ करत नाही ना?

    अंबादास दानवे म्हणाले की, विखे पाटील यांच्यावर टीका करत असतानाच, विखे पाटील विखारी असतील तर तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच दानवे यांनी भुजबळ यांच्या कायदेशीर स्थितीवर बोट ठेवत भाजपवरही निशाणा साधला. सदन घोटाळ्याचे संदर्भ देत त्यांनी आठवण करून दिली की, सदन घोटाळ्याचे मोठे मोठे भाषण देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, त्यांना भाजपनेच जेलमध्ये टाकले. याच भाजपच्या कृपेने ते (भुजबळ) सध्या जामिनावर आहेत. यावरूनच त्यांनी “जामीन कधीही रद्द होऊ शकतो,असे सूचक विधान केले आणि यामागे राज्य सरकार तर ‘खेळ’ करत नाही ना, असा प्रश्नही उपस्थित केला. मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा तिटकारा असेल तर भुजबळांनी तिकडे ढुंकूनही पाहू नये, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

    महायुतीमधील गोंधळावर टीका

    अंबादास दानवे म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणातूनच मराठी माणूस एकजुटीच्या भूमिकेकडे जात असून, येणाऱ्या दिवाळीच्या सणाला मराठी अस्मिता उजळून निघेल, बीडमधील मेळाव्यात विजय वडेट्टीवार यांच्या जुन्या वक्तव्यावरून भुजबळ यांनी त्यांना टार्गेट केल्याबद्दल, विजय वडेट्टीवार आणि भुजबळ खांद्याला खांदा आणि गळ्यात गळा घालून बोलत होते, त्यांना आता ते वाईट वाटत असेल त्याला काय करणार? असे भाष्य करून त्यांनी युतीच्या गोंधळावर टीका केली.

    Ambadas Danve Questions Chhagan Bhujbal’s Cabinet Position After Attack on Vikhe Patil; Hints at Possible Bail Cancellation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Girish Mahajan : मराठा आरक्षणाच्या जीआरचा निर्णय सरकारचा; कोणाला टार्गेट करणे योग्य नाही, भुजबळांच्या टीकेनंतर विखेंच्या साथीला गिरीश महाजन

    Pankaja Munde : बीडच्या ओबीसी मेळाव्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या- भुजबळांनी याआधीही असे मेळावे घेतलेत, त्यांनी त्यांची बाजू मांडली असावी

    Vijay Wadettiwar : भुजबळांच्या व्हिडिओवर वडेट्टीवारांचा पलटवार; ते ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवणाऱ्या फॅक्टरीत काम करतात- विजय वडेट्टीवार