• Download App
    आलिया, रणबीर १४ एप्रिलला लग्नबंधनातAlia, Ranbir tied the knot on April 14

    आलिया, रणबीर १४ एप्रिलला लग्नबंधनात ?

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सध्या बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याच्या लग्नाची धांदल आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नाची चर्चा आहे. लग्नाच्या चर्चांदरम्यान आता अखेर त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. अलीकडेच अभिनेत्री आलिया भट्टच्या काकांनी रणबीर आणि आलियाच्या लग्नाची अंतिम तारीख जाहीर केली आहे. Alia, Ranbir wedding on April 14?

    आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनी आदल्या दिवशी एका मुलाखतीत लग्नाची तारीख उघड केली होती. अलीकडेच एका वेबसाइटशी बोलताना आलियाचे वडील महेश भट्ट यांचा सावत्र भाऊ रॉबिनने सांगितले की, आलिया आणि रणबीर १४ एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहेत. १३ एप्रिलला आलियाचा मेहंदी सोहळा पार पडणार आहे. रणवीर सिंगच्या वांद्रे येथील आरके हाऊसमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे, जिथे या अभिनेत्याचे पालक ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचेही लग्न झाले होते.

    त्याचवेळी रणबीर कपूरची आई अभिनेत्री नीतू कपूर यांना याबाबत विचारण्यात आले तेव्हा तिने ‘देव जाणे असे उत्तर दिले. याआधी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात होता की, हे कपल १५ किंवा १७ एप्रिलला सात फेरे घेतील. मात्र, आता अभिनेत्रीच्या लग्नाच्या तारखेबाबतच्या अटकळांना पूर्णविराम देत काकाकडूनच लग्नाची अंतिम तारीख देण्यात आली आहे.

    मात्र, याबाबत दोन्ही कलाकारांकडून अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. पण बातम्यांनुसार, रणबीर-आलियाच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. लग्नासाठी वेडिंग प्लॅनर्सपासून केटरर्सपर्यंत सर्वांचे बुकिंग झाले आहे. याशिवाय लग्नाचे कोणतेही चित्र बाहेर येऊ नये यासाठी अंगरक्षकही नेमण्यात आले आहेत.

    Alia, Ranbir tied the knot on April 14

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Manoj Jarange : मनोज जरांगेंकडून नसरापूर प्रकरणाच्या निकालाचे स्वागत; असाच न्याय संतोष देशमुख अन् मालेगाव प्रकरणातही देण्याची मागणी

    Sudhir Mungantiwar : राज्यातील तरुण आधीच आपल्यावर प्रचंड नाराज; TET पेपरफुटी प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

    Lohagad Murder Case : सियाने केतनकडून ₹1 कोटी घेऊन चेतनला दिले; कॅब ड्रायव्हरचा दावा – सियाची बालीला जाण्याची इच्छा नव्हती, पासपोर्टही गायब केला